पोस्ट्स

मार्च, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनमत पाहता सरकार लॉकडाऊन तूर्तास लावणारही नाही, पण...

इमेज
    राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सरकार याविषयी गंभीर दिसत असले तरी जनतेचा रोष ओढून घ्यायला तयार नाही. 2020 मध्ये कोरोना विरुद्ध सर्व पक्षांनी जे एकमत दाखवले तेही आज दिसत नाही. राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस ने ही लॉकडाऊन नको ही भूमिका घेतलीय. सरकार म्हणून कर्तव्य बजावत असताना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून नाईट कर्फ्यु कधीपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे कोरोना थांबवण्यात कितपत यश येतंय हा मोठा प्रश्न.       मागील वर्षी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कित्येकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी परवड झाली. लोकांच्या व्यथा ऐकायला गेलं की मन हेलावून जातं. परंतु तरीही काहीजण जाणीवपूर्वक कोरोनाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोरोना खरच आहे की नाही? अश्या चर्चा जागोजागी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा संभ्रम आराजकतेकडे नेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाही.      कोरोना हा आजार आहेच... हे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी म...

महाड: चवदार तळे आंदोलन दिवस/ भाग १

इमेज
भाग १ - २० मार्च, १९२७ @कल्पेश जोशी    २० मार्च १९२७ हा भारताच्या सामाजिक - सांस्कृतिक इतिहासातील अतिशय क्रांतिकारी दिवस. याच दिवशी महाड येथील चवदार तळ्यातील पाणी अस्पृश्य हिंदूंसाठी खुले व्हावे म्हणून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्यातील पाणी प्राशन केले आणि घोषणा केली की आजपासून ज्या चवदार तळ्यातील पाणी सर्व स्पृश्य हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान व जनावरे पीत होती तेच पाणी आता अस्पृश्य गणल्या गेलेल्या सर्व समुदायालाही वापरता येईल. केवळ पाणी मिळावं म्हणून हे आंदोलन नव्हतं. याला सामाजिक किनार होती. हिंदू समाजात जातीभेदाच्या विकृतीमुळे हिंदू धर्मासह राष्ट्राचे जे नुकसान होत होते, ते पाहून बाबासाहेबांना अतीव वेदना होत. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य समाजाला जागृत करायला सुरुवात केली होती. स्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गातही अनेक समाज सुधारकांनी , पुढाऱ्यांनी सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे प्रयत्न हे वरवर वाटावे असे होते. सनातन्यांच्या दबावापोटी त्यांना अस्पृश्यता मुक्तीसाठी यशस्वीपणे मोहीम उघडता आली नाही. याला अपवाद होते फक्त स्वा. सावरकर. ...

महाड: चवदार तळे सत्याग्रह/ भाग २

इमेज
(२५ व २६ डिसेंबर, १९२७) @कल्पेश जोशी      महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे." त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत." अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला.      पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. जेधे-जवळकर ...

श्रीधरपंत आणि बाबासाहेब आंबेडकर

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांचे फार चांगले संबंध होते.  श्रीधरपंत आंबेडकरांचे स्नेही व चाहते होते. त्यांची मते पुरोगामी होती. परंतु आपली सुधारणावादी मते कृतीत आणणारे श्रीधरपंत अल्पायुषी ठरले. बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक विषयांना, आंदोलनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. स्पृश्य हिंदूं आणि अस्पृश्य हिंदू यांच्यात समेट घडवून आणू शकतील असा एक दुवाच हरपला होता.  मृत्यूस कवटाळण्यापूर्वी श्रीधरपंतांनी काही तास अगोदर डॉ. आंबेडकरांना पत्र पाठवून कळवले की, "हे पत्र आपल्या हाती पडण्याअगोदर बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल. महाराष्ट्रीय तरुणांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतल्यास अवघ्या पाच वर्षात हा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.   "माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी घालण्याकरीता मी पुढे जात आहे." असे त्यांनी म्हंटले होते.  आंबेडकरांच्या अंगीकृत कार्यात परमेश्वर त्यांना यश देईल असा भरवसाही त्यांनी व्यक्त केला होता....

मोदींचा सत्याग्रह: 'एक वाक्य' अनेक अर्थ

इमेज
पाकिस्तानच्या विरोधात आज आहे त्यापेक्षा कैकपटीने जास्त राग 70 च्या दशकात भारतीयांच्या मनात खदखदत होता. आणि बांग्लादेश-पाकिस्तान युद्धामुळे भारताला कुटनीती करून पाकिस्तानचा तुकडा पाडायची अनोखी संधी चालून आली होती. त्यावेळी जनसंघ म्हणजे चा आजचा भाजप फारच छोटा पक्ष होता. काँग्रेसची चलती होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. नेहरूंपासून काँग्रेसने आम्ही कसे शांततेचे कैवारी आहोत अशी जागतिक स्तरावर नेहमीच भूमिका घेतली होती. तिबेटच्या वेळी जशी तत्कालीन काँग्रेस सरकारने माती खाल्ली तशी बांग्लादेश निर्मितीत खाऊ नये म्हणून जनसंघाच्या वतीने दिल्लीत सत्याग्रह आंदोलन सुरू होते...एकप्रकारे इंदिरा गांधी सरकारवर दबाव आणला जात होता की बांग्लादेशच्या समर्थनात उतरून पाकिस्तानचा तुकडा पाडा. भविष्यात हाच देश आपला चांगला मित्र म्हणून पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करताना मदतीस येईल. असे अनेक उद्देश्य ही त्यामागे होते. अटल बिहारी वाजपेयी हजारोंच्या सभेला संबोधित करत असल्याचे कात्रण खाली जोडले आहे. त्यावरून लक्षात येईल.  बांग्लादेश सरकारने बांग्लादेश मुक्तीसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या...

ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सडेतोड भूमिका घेतात

इमेज
महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे."  त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत."  अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला.  पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते.  बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.  जेधे-जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी महाड सत्याग्रहाला आप...

जेव्हा स्वा. सावरकर स्वतः बाबासाहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात...

इमेज
'चवदार तळे सत्याग्रह' याविषयी कोणी ऐकले किंवा वाचले नसेल अशी क्वचितच कोणी सापडू शकेल. विषमतेच्या पू. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वातील  क्रांतिकारी आंदोलन म्हणून याची ओळख आहे. परंतु या आंदोलनानंतर तळे बाटवले म्हणून महाड येथील स्पृश्य हिंदूंनी ठिकठिकाणी गाठून अस्पृश्यांना मारहाण केली व याचे पर्यवसान दंगलीत झाले. अनेकजण जखमी झाले. पू. बाबासाहेबांना यामुळे खूप दुःख झाले.  या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे तर अखिल भारतात उमटले. स्पृश्यांनी अस्पृश्यांवर केलेल्या या हल्ल्यामुळे अस्पृश्यता निवारण चळवळ अधिक त्वेषाने सुरू झाली. पुरोगामी चळवळीतले अनेक नेते पुढारी आता पुढे येऊन भाषणं ठोकू लागले होते. 'ब्राम्हण-ब्राह्मणेतर' पाक्षिकाचे संपादक देवराव नाईक व प्रबोधनकार ठाकरे यांनीही प्रक्षोभक भाषण करून निषेध नोंदवला.  परंतु या सर्व प्रकरणात अस्पृश्यांची बाजू मनोभावे घेतली असेल तर ती वीर सावरकरांनी.  स्वा. सावरकरांनी  'श्रद्धानंद' मधून स्पष्टपणे घोषित केले की "आपल्या धर्म बांधवांना निष्कारण पशुहूनही अस्पृश्य लेखणे हा मनुष्यजातीचाच नव्हे तर आपल...

एक वाईट प्रथा संपली म्हणायची

इमेज
पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला असला तरी मुलीने धर्मांतर केल्याशिवाय हा विवाह वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. मात्र, दोघेही सहमतीने एकत्र राहू शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे.  पण या संदर्भांतील वार्तांकन थोडं चुकीच्या सुरात होताना दिसतंय. जणू काही कोर्टाने नवीन काही नियम लागू केला आणि हिंदूंवर अन्याय झाला असा भावार्थ उमटतोय. परंतु यात कोर्टाने नवीन काहीच सांगितलेलं नाहीये. मुस्लिम विवाह कायद्यात मुस्लिम स्त्रीला दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करता येणार नाही असं म्हंटलेलं आहे. त्याचाच कोर्टाने पूनरुच्चार केला आहे. पण यामुळे हिंदू समाजासाठी एक फायदा होऊ शकतो. इस्लाम मध्ये लग्नाच्या बाबतीत स्त्रीला फक्त येण्याचा दरवाजा उघडा आहे पण जण्याचा बंद. म्हणजे मुस्लिम पुरुषासोबत अन्य धर्मीय स्त्री विवाह करू शकते पण मुस्लिम स्त्रीला अन्य धर्मीय व्यक्तीसोबत विवाहाची मान्यता मुस्लिम कायदा देत नाही. हिंदूंना सदर स्त्री कोणत्याही धर्माचे पालन...

विषय इथेच थांबत नाही!

इमेज
#हलाल शब्द सरकारी दस्तावेज मधून भलेही काढला गेला असेल, पण त्यामुळे हलाल व्यवस्था भारतातून बंद होत नाही. डागडुजी करण्यासारखी क्षुल्लक गोष्ट आहे का ही?  आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत असा संकल्प आपण करत असताना या स्वदेशी कंपन्यांना सुद्धा हलाल इकॉनॉमीमुळे त्यांच्यापुढे झुकावे लागत आहे, इतकी मोठी गोष्ट आहे ही.  पतंजली प्रॉडक्ट्स, हल्दीराम, मॅक्डोनाल्ड, kitkat, आशीर्वाद अश्या बऱ्याच कंपन्या हलाल सर्टिफिकेट घेऊन व्यापार करू लागल्या आहेत. बाकीच्या कंपन्यांना ही हे हलाल सर्टिफिकेट घ्यावे लागेल नाहीतर मुसलमान त्यांचे उत्पादन घेणार नाहीत.  काय करणार बोला???  आपल्याकडे लोकांना हलाल चा धोकाच अजून माहीत नाही. तिकडे श्रीलंकेत हलाल ला विरोध वाढू लागल्यावर तेथील सरकारने बंदी आणली. विशेष म्हणजे तिथल्या मुसलमानांनाच पुढाकार घ्यावा लागला. आपल्याकडे उलट परिस्थिती आहे. हलाल इकॉनॉमी मध्ये गुंतवणूक करण्यात भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारत ब्राझील नंतर मोठ्या प्रमाणात मांसाहार पदार्थ पुरवणारा देश आहे.  तुमची वस्तू हलाल सर्टीफाईड असेल तरच आम्ही...

राष्ट्र निर्माणाचे 'शुभसंकेत'

इमेज
@कल्पेश जोशी  अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरू झाले आणि देशात एकूणच जी चैतन्याची लाट उसळली आहे, त्यामुळे भारत पुन्हा विश्वगुरुपदी विराजमान होणार असा विश्वास जनभावनेतून दिसू लागला आहे. मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने लोक प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिर निर्माणसाठी खारीचा वाटा उचलत आहे. परंतु या सगळ्यात एक वर्ग असाही आहे, ज्यांना मोठं दुःख झालेलं दिसून येतंय. रामायणात एक प्रसंग आहे, सेतू निर्मितीचा. लंकेत जाण्यासाठी प्रभू रामचंद्राच्या मदतीला पशु, पक्षी, प्राणी, मानव सारेच धावून आले. रावणाच्या गुप्तहेरने ही वार्ता रावणाला सांगितली तेव्हा त्याचा विश्वासच बसेना. रावण म्हणतो अरे ते दोन भटके जीव जंगलातले प्राणी, अप्रशिक्षित लोक या रावणाला युद्धात हरवण्यासाठी सेतू बांधून येताहेत..? असं म्हणत मोठ्याने हसून आपल्याच गुप्तहेराला रावण वेड्यात काढतो. परंतु सत्याचा आणि धर्माचा विजय होण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या मदतीला खारूताईसुद्धा आपला वाटा उचलत होती. अखेर सेतू पूर्ण होऊन रामसेना लंकेत दाखल झाली. अहंकारी रावण हे पचवून घ्यायलाच तयार नव्हता. जेव्हा अंगद रामसंदेश घेऊन जातो तेव्...

बुरखा फाटला, पण परिणामांचे काय?

इमेज
@कल्पेश जोशी २६ जानेवारी १९५० रोजी भारताच्या तत्कालीन सरकारने राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाची अंमलबजावणी सुरू करून लोकशाहीप्रधान गणराज्याचा कारभार सुरू केला. याच दिवशी या सर्व लोकप्रतिनिधीनी शपथ घेतली की संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही. किती मतभेद झाले, कितीही राजकारण तापले आणि कितीही मनाविरुद्ध जनमत तयार झाले तरी देशाच्या सार्वभौमत्वाला, अखंडत्वाला आणि राष्ट्रीयत्वाला धक्का लागणार नाही. परंतु ७० वर्षानंतर नुकत्याच पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या रूपात शेतकरी कायद्यांना सरकारने मागे घ्यावे म्हणून सुरू झालेले आंदोलन थेट भारताच्या गौरवाची ग्वाही देणाऱ्या लाल किल्ल्यावर असे धडकले की त्यांनी जणू या वास्तूची विटंबना करत भारताच्या सर्वभौमत्वावर घणाघात केले.  या घटनेचे देशभरात प्रचंड तीव्र भावना उमटत आहे, किंबहुना आता जनतेला कळून चुकले आहे की हे शेतकरी आंदोलन नसून देशविरोधी शक्ती एकत्र येऊन अराजकता पसरवण्यासाठी केलेला नंगानाच आहे. शेतकरी रूपातील आंदोलकांनी...

तिरंग्याचा अवमान झालाच नाही..

इमेज
#तिरपीटांग वाचून आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. वरील वाक्य सध्या सर्वच पुरोगामी, लिबरल, डावे, काँग्रेसी, ब्रिगेडी, खलिस्तानी, नक्षली आणि एकूणच मोदी विरोधकांच्या तोंडात दिसून येतंय. मग ते असत्य खोटं कसं असेल?   ही सगळी मंडळी जे सत्य असतं ते बोलते असं नाही, तर ते जे बोलतात ते सत्य असतं.  तुम्ही मोदीभक्तांच काय ऐकता? २६ जानेवारी रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर जे काही घडलं ते पण एक नाटक च होतं. जे लोक तुम्ही म्हणतात तिरंग्याचा अवमान केला.. ते हातात तिरंगा घेऊन आंदोलन करत होते. मग ते देशविरोधी असतील का, ते तर देशभक्त होते. नाहीतर त्यांनी हातात तिरंगाच घेतला नसता ना.  काही मोदीभक्त म्हणतात की घुमटावर चढलेल्या एका व्यक्तीने तिरंगा फेकला. अरे... फेकला असेल. त्या झेंड्याच्या काठीला काही काटे वगैरे असतील. काठी जड असेल वजनाला. नाहीतर त्या माणसाच्या हाताला कळ लागली असेल,, म्हणून फेकला त्यानी तो झेंडा. नाहीतर तो वरती कशाला घेऊन जाईल बरं. आपल्या बारामती वाल्या सायबांनी तरी कुठं म्हंटलं की तिरंग्याचा अवमान झाला म्हणून. त्यामुळे तिरंग्याचा अवमान झालेला नाहीये. एका तिरंग...

दोन घटना, दोन बोध

इमेज
केरळमध्ये आज पीएफआय या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेकडून 1921 मध्ये घडलेल्या मोपला बंडाच्या शतकपूर्ती निमित्त रॅली काढली होती आणि या रॅली मध्ये ब्रिटिश अधिकारी व संघाचे स्वयंसेवक सजीव देखाव्यात कैद करून त्यांना हाकलून लावत असल्याचे दाखवले. समाजमानातून यावर स्वाभाविकपणे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मलबार येथे खिलाफत आंदोलनाची परिणीती म्हणून जो हजारो हिंदूंचा नरसंहार झाला त्याचा आनंदोत्सव आज पीएफआय ने व्यक्त केला आहे. यातून त्यांची देश विघातक मानसिकता पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.  संघाला आपला कट्टर शत्रू मानणाऱ्या या संघटनेचे कारनामे अनेकदा समोर आले आहेत. आपल्या अश्या कृत्यातून त्यांना संघाला संपवायचं आणि भारतात आपली सत्ता आणायची आहे असा काहीसा अर्थ निघतो, तो किती केविलवाणा म्हणावा. खरं म्हणजे संघाविरुद्ध कितीही गरळ ओकली, हिंसा केली, खून केले तरी संघ विचलित होत नाही, ही यांची खरी दुखरी बाजू आहे. आजही पीएफआयच्या या कृत्याला संघाने अधिकृत काही उत्तर दिले नाही, त्यामुळे त्यांचा तिळपापड झालाच असणार. असो. असंच एक वेगळं वृत्त राजस्थान मधील.  राजस्थान मधल्या राजसमंद येथील नि...