पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राममंदिरामुळे देशाच्या विकासाला काय फायदा होणार आहे?

इमेज
५ ऑगस्ट रोजी प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ऐतिहासिक भूमीपूजन संपन्न झाले. कित्येक आनंदाश्रू या सोहळ्याचे साक्षी बनले. परंतु, देशातील काही तथाकथित पुरोगामी सेक्युलरांना मात्र जणू सुतक पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संविधानिक पद्धतीने सगळे झालेले असताना ते दुःखी झाले आहेत. हिंदुत्ववादी या दुःखी आत्म्यांची फार टर उडवीत आहेत, पण त्यांचे दुःख समजून घेतले पाहिजे. त्यांचे रडणे स्वाभाविक आहे, कारण मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांनी जी स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळत आहेत व खरा भारत निर्माण होत आहे. या नवभारत निर्मितीत कुठेही वैयक्तिक स्वार्थ नाही. स्वार्थविना कुणी इतकी यशस्वी आणि मोठं होऊ शकतं का, याचं सकारात्मक उत्तर पचवणे त्यांना कठीण झाले आहे. असो.  राम मंदिर बांधून देशाला काय फायदा होणार आहे? देशाच्या विकासात काय भर पडणार आहे? गरीबाच्या थाळीत काय पडणार आहे. देशाला शाळा, हॉस्पिटलची गरज आहे. राममंदिरामुळे कोरोना जाणार आहे का? अशी अनेक प्रश्न कथित लिब्रांडूना पडली. मंदिरांची तुलना हॉस्पिटल आणि शाळांशी जशी केली जात आहे तशी देशभरात बेगुमानपणे वाढत चाललेल्या मशिदी, मदरस...

...इथे माणुसकी ओशाळली!

इमेज
... इथे माणुसकी ओशाळली! #पालघर येथे घडलेला प्रकार इतका लाजिरवाणा आहे, की याचे कोणतेही राजकारण न होता खरोखर हल्लेखोर नर पिशाच्च लोकांवर कठोर करावी व्हायला हवी. इतक्या क्रूरतेने कोणी मारहाण करून जीव घेत असेल तर अश्या लोकांवर कारवाई काय होते हेही समाजासमोर येणे गरजेचे झाले आहे. कारण मागील काही वर्षात देशभरात मॉब लिंचिंगचे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोणावर चोरीचा किंवा मुलं पळवणारे म्हणून संशय घेऊन मारहाण करण्याचे प्रकार सातत्याने होत आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. मुंबईच्या कांदिवली येथून आपल्या गुरूंचे निधन झाल्यामुळे तातडीने जावे लागत असल्यामुळे सुरतकडे निघालेल्या सुरेश महाराज गिरी (वय 35), कल्पवृक्ष महाराज (वय 70) आणि त्यांचा 30 वर्ष वयाचा चालक हे तिघेजण सुरतकडे आपल्या  गाडीतून रवाना झाले होते. 16 तारखेला रात्री 9.30 वाजता ते तिघे गडचिंचले येथे पोहचले. त्याच रात्री त्यांच्यावर तेथे जमलेल्या शेकडो लोकांच्या जमावाने हल्ला चढवला. पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. दरोडेखोर...

मॉब लिंचिंग की हत्याकांड?

इमेज
मॉब लिंचिंग की हत्याकांड?  #पालघर घटना घडून आज (21 एप्रिल) पाच दिवस झाले. सोशल मीडियात ही घटना समोर येऊन तीन दिवस आणि प्रसार माध्यमात (खऱ्या अर्थाने) येऊन दोन दिवस झाले आहेत. या पाच दिवसात अनेक घडामोडी घडल्या, क्रिया प्रतिक्रिया उमटल्या, राजकारण करून झाले. परंतु, काही तथ्य या निमित्ताने समोर आले आहेत. त्यामुळे पालघर हत्याकांड ही अफवेतून झालेली मॉब लिंचिंग आहे की भगवे वस्त्र धारण केलेल्या संतांना मारलेला कट आहे, याबाबद्दल शंका गडद होऊ लागल्या आहेत.  पालघर जिल्ह्यातील ज्या कासा या गावाजवळील गडचिंचले गावात तीन साधूंची जमावाने हत्या केली, त्या गावातील सरपंच भाजपच्या असल्यामुळे यामागे भाजपचा हात असल्याचा दावा करण्यास सुरुवात झाली. परंतु, तेथील सरपंच कोणी कुख्यात गुंड प्रवृत्तीची किंवा त्या भागात मोठा पगडा आहे आणि सर्व लोक त्यांच्या शब्दाखाली आहेत अशी व्यक्ती होती का? हा साधा प्रश्न आपल्याला हा दावा किती हास्यास्पद आहे हे दर्शवून देतो. सरपंच कधीपासून इतके शक्तिशाली होऊ लागले?  चित्रा चौधरी नामक महिला तेथील सरपंच आहेत आणि कदाचित प्रथमच त्या सरपंचपदी बसल्या आहेत. असे ...

टिकटॉकवर बंदी यावीच, पण...

इमेज
टिकटॉकवर बंदी यावीच, पण... टिकटॉक एप्पच्या विरोधात देशात एक लहर उठली आहे. जातीवाचक, धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी व महिला अत्याचारांना उत्तेजना देणाऱ्या व्हिडिओमुळे टिकटॉक चर्चेत आले. देशात या विरोधात एवढी मोठी लहर उठली कि प्ले स्टोअर वर 4.6 रेटिंग असलेले हे एप्प आज 1.3 इतक्या नीचांकी रेटिंग वर येऊन पोहचले आहे. निमित्त ठरले फैजल सिद्दिकी या टिकटॉकरचे. एसिड हल्ल्यांना समर्थन व उत्तेजन देणाऱ्या त्याच्या व्हिडिओमुळे समाजमनात संतप्त भावना उमटल्या, आणि असे एक एक व्हिडीओ समोर येत गेले व थेट टिकटॉक बंदीची मागणी उठली. भारतीय महिला आयोगानेही आता टिकटॉकवर बंदी आणण्याची केंद्र सरकारकडे मागणी केली आहे.  टिकटॉक बंदीची मागणी करणाऱ्या मंडळींची मागणी चुकीचे आहे, असे कोणीही म्हणू शकणार नाही. टिकटॉकमुळे अनेक तरुण तरुणींना अक्षरशः वेड लागण्याची पाळी आली आहे. मनोरंजन, विनोद, व्यंग, खिल्ली उडवणे व ट्रोल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टिकटॉकचा वापर होऊ लागला. जास्तीतजास्त कमेंट्स, फोलोअर्स वाढवण्याचा इर्ष्येपायी दररोज नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी सुरुवात झाली, त्याचे रुपांतर सवयीत कधी झाले हे त...

सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी

इमेज
सनातनची हत्या व मुस्लिम व्यापार श्रेणी आसाम मध्ये लॉकडाऊन काळात रोजीरोटीसाठी सायकल वरून भाजीपाला विकणाऱ्या सनातन डेकी या हिंदू गृहस्थाची मुस्लिम जमावाने अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. "मुस्लिम मोहल्ले मे सब्जी बेचने क्यू आया?" असे म्हणत या मुस्लिम जमावाने सनातन डेकी याचा जीव घेतला. देशभरात या घटनेच्या विरोधात संताप उफाळत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांचा विचार जरी केला तरी हिंदू विक्रेते, व्यापारी यांच्यावर मुस्लिमांकडून बहिष्कार घालण्याच्या घटना घडलेल्या आहेत असे लक्षात येते. हिंदू कधीतरी याचा गांभीर्याने विचार करणार आहेत की नाही? या घटना घडल्यावर नुसतीच आदळआपट आणि चर्चा करून काय साध्य होणार आहे. सोशल मीडियात रोष व्यक्त करून काय उपयोग आहे?  १०० कोटी हिंदूंच्या देशात आज २५ कोटी मुसलमानांची तंत्रशुद्ध व्यापार यंत्रणा अस्तित्वात आहे. या रचनेत कोणाही हिंदू, जैन, बौद्ध, शीख यांना स्थान नाही. स्थान मिळालेच तर ते सर्वात शेवटी म्हणजेच किरकोळ विक्रेता किंवा ग्राहक म्हणून. ते म्हणतील त्या दराला/किमतीला तुम्हाला 'हो' म्हणण्य...

भाग १ - शांतता दूत की चिनी हस्तक?

इमेज
युद्धाचा विषय येताच नमती भाषा का सुरू होते? याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला. भाग १ - शांतता दूत की चिनी हस्तक? सध्या भारत चीन संबंधाने देशात वातावरण तापले आहे. भारत-पाकिस्तान विवाद विषय तर नित्याचे आहे. परंतु जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते किंवा युद्ध म्हणून चर्चा सुरू होते तेव्हा विशिष्ट लोक भारताला सबुरीचा सल्ला देऊन कमी का लेखतात, असा प्रश्न अनेकांच्या मनाला स्पर्शून जात असेल यात शंका नाही.  भारताचे शस्त्र, सैनिक संख्या, आर्थिक संकट, देशांतर्गत परिस्थिती यासोबतच शत्रू राष्ट्र आपल्यापेक्षा कसे बलशाली आहे हे दाखविण्याचा तथाकथित बुद्धिवादी प्रयत्न वारंवार करत असतात. आपण या कडे फार समजूतदार भूमिका म्हणून बघत असतो, परंतु दुसऱ्या बाजूने विचार करू गेल्यास भारताला सतत नमतं घेण्यासाठी एक विचारवंतांची फौज कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते.  सध्या भारत चीन दरम्यान गलवान खोऱ्यातील घटनेमुळे वातावरण तापले आहे. या परिस्थितीत भारत चीन युद्ध या विषयावर चर्चा सुरू झाली आणि चीन भारतापेक्षा कसा शक्तिशाली आहे हे दाखवले जात आहे. यामध्ये काही विशिष्ट व...

भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे

इमेज
युद्धाचा विषय निघताच नमती भाषा का सुरू होते? याचे सांगोपांग स्पष्टीकरण करणारी लेखमाला.. भाग २ - चिनी हस्तक व कम्युनिस्ट अजेंडे चीनचा अजून एक अजेंडा म्हणजे समाजवाद्यांच्या हातून लोकमानसात माओवादी विचारांची (अप्रत्यक्ष) पेरणी करणे होय. चीनने ज्याप्रमाणे तिबेट बळकावले आहे, त्याप्रमाणे नेपाळ, भूतान व नंतर माओ ने सांगितल्या नुसार भारतातील अरुणाचल प्रदेश, लडाख, गलवान याकडे त्याची वक्रदृष्टी आहे. लोकांचा त्यांच्या संस्कृती, परंपरांवरून विश्वास उडवायचा, राष्ट्रीय भावना कमजोर करायची नंतर 'लालक्रांती' करायची, अशी त्यांची साम्राज्यवादी पद्धत राहिली आहे. भारतात संस्कृती, परंपरा, सद्भावना व राष्ट्रीय भावनेस छेद देणाऱ्या टुकडे टुकडे गँगसारख्या विकृती तेच काम राजरोसपणे करत असतात. या माओवादी अजेंड्याला खतपाणी घालण्यासाठी चीनने मोठी फळी मीडियात उभी केलेली आहे. भारताची जागतिक स्तरावर बदनामी करण्याचे उद्योग त्यांच्याद्वारेच केले जातात. भारतातील विशिष्ट माध्यमे, पत्रकार मंडळी, लेखक, न्यूज चॅनल्स यांची दुकाने चीनच्या भरवश्यावर सुरू आहेत. अनेक पत्रकार, लेखकांना पैसे देऊन हवे ते आर्टिकल्स...

भोंगे आणि सोंगे

इमेज
भोंगे म्हंटल्यावर मशिदीवरील भोंगे हा संबंध सर्वांना खूप ओळखीचा व जुना झाला आहे तरीही दर काही महिन्यांनी या भोंग्यावरून गदारोळ उठतो पण, त्यावर तोडगा काढण्यासाठी कुणी राजकारणी जोखीम पत्करायला तयार नाही. मतांचे ध्रुवीकरण होण्याची भीती त्यांना वाटत असावी. म्हणूनच की काय तथाकथित हिंदुत्ववादीही आता या विषयावर बोलायला तयार नाही.  मुंबईत काल पर्वा एक विस्मयकारक घटना घडली. एक हिंदू तरुणी "मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी करा" असे सांगण्यासाठी थेट मशिदीजवळ गेली. तेव्हा स्वाभाविकपणे तिचे तेथील तथाकथित शांतताप्रिय समुदयासोबत "तू तू मै मै" झाले. करिष्मा भोसले असे या धाडसी तरुणीचे नाव आहे. विशेष म्हणजे या तरुणीशी चर्चा व समजूतदारपणे बोलायचे सोडून महिला म्हणून काहीही मान मर्यादा न बाळगता तेथे उपस्थित मुस्लिम गृहस्थांनी तिला शिवीगाळ केली. नंतर परिस्थितीचे गांभीर्य घेत करिष्मा सोबत भांडण्यासाठी मुस्लिम महिलांना पाचारण करण्यात आले. पण ही तरुणी सगळ्यांना पुरून उरली. शेवटी पोलिसांनी मध्यस्ती केल्यावर तिला समजूत घालून तेथून घरी पाठविण्यात आले.  नेहमीप्रमाणे लगेच याचे पडसाद उमटल...

बालपण आणि शिक्षण

इमेज
#लोकमान्य_टिळक (भाग२) बालपण आणि शिक्षण भारतमातेला पारतंत्र्यात ढकलणाऱ्या ब्रिटिशांना जन्माची अद्दल घडविणारे १८५७ चे स्वातंत्र्यसमर घडले त्याच्या अगदी एक वर्ष अगोदर रत्नागिरीत २३ जुलै, १८५६ रोजी लोकमान्य टिळकांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातले नाव 'केशव'. परंतु आई पार्वतीबाई प्रेमाने 'बाळ' म्हणून हाक मारत. ते त्यांना अधिक आवडे. त्यामुळे पुढे बाळ हेच नाव प्रसिद्ध झाले.  टिळकांचे वडील गंगाधरपंत शाळाखात्यात डेप्युटी इन्स्पेक्टरच्या हुद्द्यापर्यंत चढलेले होते. अर्थातच त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण विषयात तरबेज केले. संस्कृत श्लोकांचे अर्थ टिळक अवघ्या दहाव्या वर्षी सांगू लागले होते. सन १८६१ मध्ये टिळकांना दसऱ्याच्या दिवशी शाळेत घालण्यात आलं. त्यांच्या पहिल्या गुरूंच नाव भिकाजी कृष्ण पटवर्धन. शालेय जीवनात टिळक हट्टी, खोडकर होतेच शिवाय शाळेत हुशार विद्यार्थी असाही त्यांचा लौकिक होता.  कॉलेजात असताना प्रो. जिनसीवाले यांनी 'मातृविलाप' या विषयावर कविता करण्यास सांगितले होते. टिळकांना काव्य करण्याची फार आवड नव्हती. परंतु वर्गातील प्रतिस्पर्धी आपट्यांसारख्या निपुण ...

पेटा इंडियाची पोलखोल

इमेज
मुक्या जीवांचे तथाकथित तारणहार व बेगडी पशुप्रेमी जागतिक संघटना असलेल्या पेटाचा (PETA) हिंदुद्वेषी चेहरा अखेर उघड पडलाच. राखीपौर्णिमेच्या निमित्ताने पेटाने हिंदू सणांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. "या रक्षाबंधन ला माझी रक्षा करा. चर्म मुक्त बना". असे गुजरातमध्ये लागलेल्या पेटाचा बॅनर वरून पेटा कश्या पद्धतीने वारंवार हिंदू सणांना टार्गेट करत आहे हे समोर आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका असलेल्या शेफाली वैद्य यांनी पेटाची या प्रकरणावरून चांगलीच हजेरी घेतली.  पेटाचा या विवादित बॅनरला पाहता आपल्याला असे वाटून येईल की पेटाला गोरक्षणाची किती काळजी आहे. परंतु, वास्तविक तसे नाही. पेटाने गाईला 'बहीण' म्हणून संबोधले आहे. भारतात गाईला गोमाता म्हणून संबोधले जाते, एवढेच नाही तर तिला पूजनीय मानले गेले आहे. मग पेटाला गाईला बहीण का बनवावेसे वाटले? याचप्रमाणे  रक्षाबंधनला आजवर आपण कधी चामड्यापासून बनलेली राखी पहिली आहे का? अपवाद म्हणूनही अशी राखी सापडणार नाही. मग पेटा ने असे बॅनर लावून काय साधले? पेटाचा इतिहास पाहता असे लक्षात येते की पेटाने आजपर्यंत भारतात वारंवार हिंदू...

'केसरी', 'मराठा' व डोंगरीचा तुरुंगवास

इमेज
#लोकमान्य_टिळक (भाग २) 'केसरी', 'मराठा' व डोंगरीचा तुरुंगवास ---------- लोकमान्य टिळक व आगरकर यांचे शिक्षण विषयात एकमत होत होते. त्यामुळे त्यांनी पाश्चात्य पद्धती नसलेली व गोऱ्या शिक्षकांचा वावर नसलेली शाळा काढण्याचे ठरवले. ब्रिटिश शिक्षक त्यांच्या शाळांमधून सातत्याने स्वधर्म, स्वराज्य, भारतीय संस्कृती व परंपरा यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनात विष कालवत होते. टिळकांना  विष्णुशास्त्री चिपळूणकर, ज्यांना मराठी भाषेचे शिवाजी असे म्हटले जाई त्यांनी 'न्यू इंग्लिश स्कूल' च्या स्थापण्यासाठी मदत केली.  या शाळेत सुरुवातीला १५० व तीन महिन्यानंतर पटावरील संख्या पाचशेच्या वर गेली होती. या शाळेने पहिल्याच वर्षी जगन्नाथ शंकर शेठ ही स्कॉलरशिप मिळवली. पुढे वर्षभरानंतर विद्यार्थी संख्या एक हजारहून अधिक झाल्यानंतर व मॅट्रिकचा निकाल ८९ टक्के लागल्यानंतर गव्हर्नरने खास पत्र लिहून शाळेचा गौरव केला.  टिळक व आगरकर यांनी पुढाकार घेऊन नंतर 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्र सुद्धा सुरू केली. 'केसरी' हे मराठी भाषिक होते, तर 'मराठा' हे इंग्रजी भाषेत ...

टिळक-आगरकर विवाद

इमेज
#लोकमान्य_टिळक (भाग ३) टिळक-आगरकर विवाद  न्यू इंग्लिश स्कुलची वाढती प्रगती तेथील शिक्षक मंडळींमध्ये व संस्थापक असलेल्या टिळक, आगरकर व केळकर आदी मंडळींमध्ये आत्मविश्वास जागृत करत होती. त्यामुळे न्यू इंग्लिश स्कुलचा पुढील टप्पा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पूर्ण झाला. डिस्ट्रिक्ट जज विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली २४ ऑक्टोबर १८८४ रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. या सोसायटीच्या सभासदांमध्ये प्रारंभिस टिळक, नामजोशी, आपटे, आगरकर, गोळे, धारप व केळकर ही मंडळी होती. डॉ. भांडारकर यांनी यावेळी पुढील उद्गार काढले. "या सात गृहस्थाच्या समोर एक फर्स्ट क्लास एल. एल. बी. चे नाव आहे. हा गृहस्थ खासगी शिक्षणाच्या नादी न लागता व स्वहिताकडे पाहून सरकारी नोकरी धरता तर रावसाहेब होऊन कुठेतरी चैनीत असता". टिळकांनी या संस्था उभारणीसाठी काय प्रयत्न केले असतील ते यातून लक्षात घेण्याजोगे आहे.  तत्कालीन मुंबई चे गव्हर्नर जेम्स फर्ग्युसन यांनी एकदा इंग्लिश स्कुलला भेट दिली होती व संस्थेवर खुश होऊन १२२५ रुपयांची भेट देणगी म्हणून दिली होती. याविषयी कृतज्ञता ठेऊन २...

भूमिपूजन आणि पोटशूळ

इमेज
रामजन्मभूमी अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार म्हंटल्यावर काँग्रेससह अन्य रामजन्मभूमीच्या विरोधकांचे चांगलेच पोट दुखू लागले आहे. मागील गेल्या कित्येक वर्षात विशिष्ट पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते सामाजिक संघटनेचे कथित सामाजिक कार्यकर्ते रामजन्मभूमीचा निकाल कसा हिंदूंच्या विरोधात लागेल यासाठी उठाठेव करत होते. दिग्गज वकिलांची फौज यासाठी तयार करण्यात आली होती. परंतु, गेल्या पाचशे वर्षांपासून रामजन्मभूमी साठी लढा देणाऱ्या हिंदू समाजाला अखेर न्याय मिळाला. प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारांऱ्यांचा पराभव झाला. भारताच्या इतिहासात ९ नोव्हेंबर, २०१९ हा दिवस सुवर्णाक्षरात कोरला गेला.  आता ५ ऑगस्ट २०२० रोजी मंगल मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्या नगरीत मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. देशातील सेक्युलॅरीजमच्या नावाखाली हिंदूंना दुय्यम महत्व देणाऱ्या विशिष्ट पक्ष व नेत्यांना मात्र अजूनही श्रीराम मंदिर निकाल पचनी पडलेला दिसत नाही. कधी कोणीतरी मंदिराच्या जागी बौद्ध संस्कृती असल्याचा दावा करतो, तर कोणी लॉकडाऊन चे कारण काढत भूमीपूजन कार्यात अडथळा आणू पाहतो. डाव्यांनी ...

दहावी झाली, आता काय करू?

इमेज
दहावी-बारावीचे नुकतेच निकाल लागले आहेत. अश्या काळात पुढे काय? हा मोठा प्रश्न विद्यार्थी तसेच पालकांना पडला असेल यात नवल नाही. परंतु, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मेंढी बाजार होणार हेही तितकेच खरे. "मित्र किंवा मैत्रिण सायन्सला ऍडमिशन घेणार आहे, मग मी कसे काय आर्ट्स, कॉमर्स करू?" असा बावळट तर्क लावून बहुतांश विद्यार्थी व पालक सायन्स कडे वळतात व  झुंडीच्या झुंडी सायन्सकडे धावू लागतात. पण सायन्स फॅकल्टी किती थोतांड आणि लुबाडणूक करणारी फेकल्टी आहे हे कोणी लक्षात घेईना झालंय. सायन्समुळे सर्वसाधारण कुटुंबातील व विशेषतः गरीब घरातील विद्यार्थ्याचे मोठे नुकसान होत आले आहे. कॉलेजच्या एडमिशन फी पासून, लायब्ररी, प्रयोगशाळा, जर्नल्स, परीक्षा फी, गॅदरिंग वगैरे वगैरे कारणांनी सतत पैसा कॉलेजात जमा करावा लागतो. एडमिशन पूर्वी विद्यार्थी-पालकांना याचा गंधही नसतो.  दुसऱ्या बाजूला कॉमर्स, टेक्निकल, आयटीआय आणि विशेषतः आर्टस् ला तर एकदम बिनकामाचे शिक्षणच जणू ठरवून टाकण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा कल, आवड, क्षमता, सद्य स्थिती व भविष्याचा कानोसा न घेताच विज्ञान शाखा निवडणारे नंतर पश्चात्ताप...