पोस्ट्स

मराठवाडा मुक्तीसंग्रामचा इतिहास विसरून चालणार नाही. आम्हाला ‘या’ गंभीर प्रश्नांचा विचार करावाच लागेल!*

इमेज
1. हजारो निरपराध लोकांची हत्या करविणारा धर्मांध जिहादी कासिम रझवी 1956 मध्ये तुरुंगातून सुटताच कोणाच्या मदतीने पाकिस्तानात पळून गेला? 2. ज्या निजामामुळे हैदराबाद संस्थान एक वर्ष उशिरा स्वतंत्र झाले, हजारो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान झाले, निरपराध लोक मारल्या गेले व ज्याने स्वतंत्र इस्लामिक राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्या निजामाला पुन्हा राजप्रमुख का करण्यात आले ? 3. इत्तेहादुल मुसलमिन (MIM) या देशविरोधी धर्मांध संघटनेवर हैदराबाद संस्थान मुक्त झाल्यावर तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी तत्काळ बंदी घातली होती. या देशविघातक संघटनेची बंदी जवाहरलाल नेहरूंनी का काढली? 4. आजची ओवेसी प्रणित AIMIM संघटना ही त्याच कासिम रझवीच्या संघटनेची वारसा चालवते आहे. त्यांचे नेते कधीच मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाला अभिवादन करत नाही, मुक्तीसंग्राम दिनी झेंडावंदन करण्यासही उपस्थित राहत नाही. का? 5. ज्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वावर मुक्ती लढा यशस्वी झाला, संस्थानात काँग्रेसचे काम वाढले, त्या राष्ट्रभक्त स्वामीजींवर मुक्तीसंग्राम नंतर काँग्रेसने खोटे नाटे आरोप करून अन्...

संघाच्या भूमिकांचा त्रास कोणाला आणि का?

इमेज
पू. सरसंघचालक यांच्या मुंबईतील संत रविदास जयंती निमित्त भाषणावरून अनेक उलटसुलट चर्चा काल परवापासून सुरू झाल्या आहेत. खरेतर मोहनजी भागवत यांनी केलेले विधान हिंदू धर्माशी अतिशय पूरक आणि क्रांतिकारी असे आहे. ते म्हणाले जातीव्यवस्था आणि उच्चनीचता धर्माने किंवा देवाने केल्या नाहीत. समाजातील काही पंडित (विद्वान) लोकांनी तसा खोटा प्रचार केला. या विधानात आलेल्या पंडित नावामुळे गोंधळ झाला. परंतु संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल जी आंबेकर यांनी त्याची स्पष्टता करून पंडित म्हणजे विद्वान असा अर्थ अभिप्रेत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ब्राम्हण समाजातील संभ्रम दूर झाला. परंतु काही मंडळींनी हा वाद विनाकारण वाढवला आहे. या लोकांमुळे ब्राम्हण समाजाची बदनामी होत आहे. ब्राम्हण समाज संघाविरुद्ध आहे किंवा ब्राम्हण समजाला उच्चनीचता विरुद्ध बोललेले चालत नाही असा (गैर) अर्थ यातून काढला जात आहे.  वस्तुस्थिती तर अशी आहे की जे लोक संघाला आपली जहागीर समजत होते, ज्यांना समरसता, सर्वसमावेशक हिंदुत्व मान्य नाही किंवा जे कर्मठ, रूढीवादी आहेत त्यांनाच सरसंघचालकांच्या वक्तव्यामुळे त्रास झाला आहे....

ईडीमुळे 'जनता खुश' अन 'विरोधकांची धुसफूस

इमेज
' ईडीच्या कारवाई वरून सध्या रणकंदन माजले आहे. केंद्रीय यंत्रणांवर विरोधकांकडून अनेक आरोप होतायत. त्यात काही नवल नाही. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय यंत्रणा इतक्या बेधडकपणे कारवाई करू लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणांना सरकारने प्रोत्साहन दिले तर त्या आपल्या कर्तव्याला सिद्ध करू शकतात हे यावरून लक्षात येते.  काँग्रेस सरकारच्या काळात 2005 ते 2014 या दहा वर्षाच्या काळात केवळ 112 ईडीचे छापे पडले होते आणि त्यातून 5 हजार कोटींची संपत्ती जप्त झाली होती. परंतु मोदी सरकारच्या काळात ईडीला बूस्टर डोस मिळाला आणि केवळ आठ वर्षात 2,974 छापे ईडीकडून टाकले गेले आणि यामधून तब्बल 1 लाख कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली. विरोधक याला सुडाची कारवाई म्हणतात. परंतु जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्यांना कोणी रोखले होते का? केंद्रीय यंत्रणांच्या कारवाई केवळ राजकीय नेत्यांवरच झालेल्या नाहीत. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदी लोकांचा समावेश आहे. ज्यांनी आर्थिक अफरातफर केली, ज्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाले आणि ज्यांची गतीविधी देशविरोधी वाटली त्...

मला भावलेलं पहिलं साहित्य संमेलन

इमेज
गेल्या आठवड्यात नागपुरात समरसता साहित्य संमेलन पार पडले. मीही गेलो होतो. या अगोदर अहमदनगरला 2017 मध्ये झालेल्या समरसता साहित्य संमेलनलाही मी हजेरी लावली होती. नगरला झालेल्या संमेलनात केवळ अनुभूती घ्यायला गेलो होतो. साहित्य संमेलन म्हणजे काय, हेच जाणून घ्यायचं होतं. त्या अगोदर इतर ठिकाणी काही साहित्य संमेलनासही गेलो होतो. पण त्यामुळे माझ्या मनात साहित्य विश्वाबद्दल एकप्रकारे नकारात्मकता निर्माण झाली होती.  साहित्य संमेलन म्हंटलं की तीच ती रडकी काव्य, अमक्या वरचा अन्याय, तमक्यावरील द्वेष, राजकारण केवळ ह्याच विषयांची जंत्री पाहिली होती. आपण कोणत्या काळात जगतो आहोत हाच विसर जणू पडावा असे निरुत्साही आणि नकारात्मक वातावरण दिसले म्हणजे साहित्य संमेलन अशी भावना होऊन गेली होती.  वशिलेबाजी करून निवडक व विशिष्ट नावं पुढं करायची. सांगायला तोंड वर करून सांगायचं की हे विचारांचं व्यासपीठ, पण विशिष्ट विचाराच्या लोकांनाच तिथे संधी द्यायची. काहींना खड्यासारखे बाजूला काढून फेकायचे अश्या गोष्टी अनुभवल्या होत्या. पण या वर्षी उदगीरला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे थोडं स...

सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...?

इमेज
🇨🇳 "सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन..?" 🇵🇰 नागपूर येथे झालेल्या 19 व्या राज्यस्तरीय समरसता साहित्य संमेलनात कविता सादर करताना... -------------- कधी पाक कधी सार्क कधी म्हणतो माझा इराक  ट्रम्प मोदी वाईट तुला गोड होतो जुना बराक सरड्यासारखे रंग तुझे कितीदा बदलशीन सांग चीन सांग पाकीस्तानसोबत निकाह कधी करशिन?......१  कधी कधी तुला लागती ओबोरचे डव्हाळे पाकसोबत ग्वादारमधी करतो येडेचाळे जरा लपुन जरा छपुन जग सारं पाहतं पाकिस्तान अन् तुयं लफडं कुठी कुठी चालतं नकट्या नाकाचा तोरा तुह्या किती दावशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशीन...? ........२ चीन तुह्या प्रेमिकेले भारतानं छेडलं मोदीच्या दौ-यानी तुला रे पछाडलं खरं कारण हेच तुला चिंतांनी वेढलं म्हणुनच तू सैन्याला डोकलाममधी धाडलं सांग रे सांग तू किती दिवस लपवशिन सांग चीन पाकिस्तानसोबत निकाह कधी करशिन...? ..........३ प्रेमिका तुही भारी खरच मानलं तुला बुवा अल्ला फादर गाॅड सांग घेतल्या कुणाच्या दुवा बुरख्यामागची हसीना तिच तेवढी दिसत नाही हाफीज आहे? अझर आहे की लखवी काही कळत नाही सांग तुझ्या प्रेमीकेल...

आपली संस्कृती विकृतीकडे जाते, तेव्हा आम्ही काय करतो?

इमेज
* आपल्या संस्कृतीवर कोणी चुकीची टिप्पणी केली म्हणून आम्हाला सहन होत नाही पण, आम्ही कधी 'या' गोष्टींचा विचार करतो का? 👉🏼 'विवाहपद्धती' हा एक धार्मिक विधी आहे, पण आम्ही त्याला 'फॅमिली इव्हेंट' केला की नाही? 👉🏼विवाह विधीपेक्षा आम्ही बँड पार्टी, डीजे, अर्केस्ट्रा त्यासोबतच चमकोगिरी, पैश्याचा माज, चुलत्याची जिरवनं, हौस पूर्ण करणं यालाच महत्व देतो की नाही? 👉🏼लग्न लागताना मुहूर्ताची वेळ टाळून दोन दोन - तीन तीन तास उशिराने लग्न लावतो. का, तर वरातीत दारू पिऊन नाचणाऱ्या मित्रांच्या इच्छेसाठी. अन पुरोहिताला मात्र शॉर्टकट विधी उरकायला भाग पाडतो.  👉🏼लग्नात वरमाला घालण्याचं मोठं महत्व सांगितलं आहे. पण, वरमाला घालताना नवरदेवाचे मित्र त्याला खांद्यावर का उचलतात? हा चेष्टा मस्करीचा विषय असतो का? ही फालतुगिरी गपगुमान सहन करणारी उपस्थित पुरोहित, वयस्कर व ज्येष्ठ मंडळी याला जबाबदार आहे की नाही? 👉🏼लग्न विधी होत असताना उपस्थित मंडळी 'वर' आणि 'वधू'ला आशीर्वाद देण्यासाठी आणि ते जे सामाजिक व्रत स्वीकारत आहेत, त्यासाठीचे साक्षीदार असतात. ...

भारताचं भविष्य अग्निवीरांच्या हाती!

इमेज
मोदी सरकारच्या अग्निपथ योजनेमुळे अनेकांना प्रश्न पडला असेल की सरकारने सैनिकांचे निवृत्ती मर्यादा 4 वर्षावरच का आणली?  पण लक्षात घ्या.... #आतंकवाद आणि #सिव्हिलवॉर ही भविष्यातील दोन मोठी आव्हाने भारतासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी सरकारने या योजनेचा विचार केला असावा असे वाटते.  चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर 25 टक्के जवानांचा पुढील कार्यकाळ वाढवण्यासाठी मूल्यांकन होईल आणि उर्वरित 75 टक्के जवानांना आपल्या आवडत्या क्षेत्रात नोकरीसाठी वाव असेल. तिथे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. देशातील विविध क्षेत्रात ही देशभक्तीने ओतप्रोत, शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष माणसं जावी असाही यामागचा उद्देश असेलच.  त्यामुळे सैनिकी प्रशिक्षण घेतलेले जवान जेव्हा भारतभर ग्राऊंडवर काम करू लागतील तेव्हा आतंकवाद्यांच्या स्लीपर सेल ची वाट लावतील. शिवाय सिव्हिल वॉर चा प्रयत्न केला तर तोही हाणून पाडला जाईल.  मोदी सरकार आल्यापासून दहशतवाद्यांची मोठी गोची झालीय. त्यांना धड घुसखोरीही करता येत नाहीये की काही गतीविधींना पूर्ण करता येतंय. भारताची सीमा सुरक्षा अतिशय मजबूत झाली असल्यामुळे ...