पोस्ट्स

बंगाल हिंसाचार आणि हिंदू मानसिकता

इमेज
'आजचा बंगाल उद्याच्या काश्मीरकडे जात आहे' असे म्हंटल्यास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून अराजकवाद व दहशत निर्माण करणाऱ्या आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहे व विशेषतः आताच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंदूंसोबत झालेला नरसंहार पाहता ह्या घटना बंगाल मधील आहे की काश्मीर मधील, असा प्रश्न पडतो. त्यामुळे बंगाल आता भारताच्या भूमीवरील अराजक, मुस्लिम दहशत, धर्मांध व पुढे चालून फुटीरतावाद याला पोसणारं नवीन राज्य निर्माण होत आहे असे लक्षात येईल.  बंगाल मधील ममता सरकारने लोकशाही आणि संविधानिक शासन प्रणाली अक्षरशः गुंडाळून ठेवली आहे. 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्ता व स्थानिक धर्मांध जिहादी यांनी जो नंगानाच केला तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच असावा असे मत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. यावरून या घटनांची भीषणता लक्षात येते. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे, महिलांवर बलात्कार होत आहेत, ज्या लोकांनी भाजपला समर्थन केले त्यांच्या घरांवर हल्ले होत आहे, त्यांची संपत्त...

जनमत पाहता सरकार लॉकडाऊन तूर्तास लावणारही नाही, पण...

इमेज
    राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सरकार याविषयी गंभीर दिसत असले तरी जनतेचा रोष ओढून घ्यायला तयार नाही. 2020 मध्ये कोरोना विरुद्ध सर्व पक्षांनी जे एकमत दाखवले तेही आज दिसत नाही. राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस ने ही लॉकडाऊन नको ही भूमिका घेतलीय. सरकार म्हणून कर्तव्य बजावत असताना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून नाईट कर्फ्यु कधीपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे कोरोना थांबवण्यात कितपत यश येतंय हा मोठा प्रश्न.       मागील वर्षी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कित्येकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी परवड झाली. लोकांच्या व्यथा ऐकायला गेलं की मन हेलावून जातं. परंतु तरीही काहीजण जाणीवपूर्वक कोरोनाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोरोना खरच आहे की नाही? अश्या चर्चा जागोजागी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा संभ्रम आराजकतेकडे नेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाही.      कोरोना हा आजार आहेच... हे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी म...

महाड: चवदार तळे आंदोलन दिवस/ भाग १

इमेज
भाग १ - २० मार्च, १९२७ @कल्पेश जोशी    २० मार्च १९२७ हा भारताच्या सामाजिक - सांस्कृतिक इतिहासातील अतिशय क्रांतिकारी दिवस. याच दिवशी महाड येथील चवदार तळ्यातील पाणी अस्पृश्य हिंदूंसाठी खुले व्हावे म्हणून पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या तळ्यातील पाणी प्राशन केले आणि घोषणा केली की आजपासून ज्या चवदार तळ्यातील पाणी सर्व स्पृश्य हिंदू, ख्रिश्चन, मुसलमान व जनावरे पीत होती तेच पाणी आता अस्पृश्य गणल्या गेलेल्या सर्व समुदायालाही वापरता येईल. केवळ पाणी मिळावं म्हणून हे आंदोलन नव्हतं. याला सामाजिक किनार होती. हिंदू समाजात जातीभेदाच्या विकृतीमुळे हिंदू धर्मासह राष्ट्राचे जे नुकसान होत होते, ते पाहून बाबासाहेबांना अतीव वेदना होत. त्यामुळे त्यांनी अस्पृश्य समाजाला जागृत करायला सुरुवात केली होती. स्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गातही अनेक समाज सुधारकांनी , पुढाऱ्यांनी सामाजिक समरसता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांचे प्रयत्न हे वरवर वाटावे असे होते. सनातन्यांच्या दबावापोटी त्यांना अस्पृश्यता मुक्तीसाठी यशस्वीपणे मोहीम उघडता आली नाही. याला अपवाद होते फक्त स्वा. सावरकर. ...

महाड: चवदार तळे सत्याग्रह/ भाग २

इमेज
(२५ व २६ डिसेंबर, १९२७) @कल्पेश जोशी      महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे." त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत." अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला.      पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते. बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. जेधे-जवळकर ...

श्रीधरपंत आणि बाबासाहेब आंबेडकर

इमेज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधरपंत टिळक यांचे फार चांगले संबंध होते.  श्रीधरपंत आंबेडकरांचे स्नेही व चाहते होते. त्यांची मते पुरोगामी होती. परंतु आपली सुधारणावादी मते कृतीत आणणारे श्रीधरपंत अल्पायुषी ठरले. बाबासाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक विषयांना, आंदोलनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. स्पृश्य हिंदूं आणि अस्पृश्य हिंदू यांच्यात समेट घडवून आणू शकतील असा एक दुवाच हरपला होता.  मृत्यूस कवटाळण्यापूर्वी श्रीधरपंतांनी काही तास अगोदर डॉ. आंबेडकरांना पत्र पाठवून कळवले की, "हे पत्र आपल्या हाती पडण्याअगोदर बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल. महाराष्ट्रीय तरुणांनी अस्पृश्यतेचा प्रश्न हाती घेतल्यास अवघ्या पाच वर्षात हा प्रश्न सुटेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.   "माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणारविंदी घालण्याकरीता मी पुढे जात आहे." असे त्यांनी म्हंटले होते.  आंबेडकरांच्या अंगीकृत कार्यात परमेश्वर त्यांना यश देईल असा भरवसाही त्यांनी व्यक्त केला होता....

मोदींचा सत्याग्रह: 'एक वाक्य' अनेक अर्थ

इमेज
पाकिस्तानच्या विरोधात आज आहे त्यापेक्षा कैकपटीने जास्त राग 70 च्या दशकात भारतीयांच्या मनात खदखदत होता. आणि बांग्लादेश-पाकिस्तान युद्धामुळे भारताला कुटनीती करून पाकिस्तानचा तुकडा पाडायची अनोखी संधी चालून आली होती. त्यावेळी जनसंघ म्हणजे चा आजचा भाजप फारच छोटा पक्ष होता. काँग्रेसची चलती होती. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. नेहरूंपासून काँग्रेसने आम्ही कसे शांततेचे कैवारी आहोत अशी जागतिक स्तरावर नेहमीच भूमिका घेतली होती. तिबेटच्या वेळी जशी तत्कालीन काँग्रेस सरकारने माती खाल्ली तशी बांग्लादेश निर्मितीत खाऊ नये म्हणून जनसंघाच्या वतीने दिल्लीत सत्याग्रह आंदोलन सुरू होते...एकप्रकारे इंदिरा गांधी सरकारवर दबाव आणला जात होता की बांग्लादेशच्या समर्थनात उतरून पाकिस्तानचा तुकडा पाडा. भविष्यात हाच देश आपला चांगला मित्र म्हणून पाकिस्तानच्या विरोधात कारवाई करताना मदतीस येईल. असे अनेक उद्देश्य ही त्यामागे होते. अटल बिहारी वाजपेयी हजारोंच्या सभेला संबोधित करत असल्याचे कात्रण खाली जोडले आहे. त्यावरून लक्षात येईल.  बांग्लादेश सरकारने बांग्लादेश मुक्तीसाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या...

ब्राम्हण लोक काही आमचे वैरी नाहीत... डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सडेतोड भूमिका घेतात

इमेज
महाड येथील चवदार तळे आंदोलनानंतर उसळलेल्या दंगलीमुळे पू. बाबासाहेबांना दुःख झालेच शिवाय चीडही आली. मुसलमान तळ्यातील पाणी पितो तर त्याचा स्पृश्य हिंदूंना विटाळ होत नाही, पण अस्पृश्यांच्या स्पर्शाने तळे बाटले जाते अशी गर्जना करणाऱ्या धर्मघातकी हिंदूंना त्यांनी बजावले की, "हे काही धर्मरक्षण नव्हे, हा धर्मद्रोह आहे."  त्यांनी भीमगर्जना केली की, "अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरील कलंक नसून तो आमच्या देहावरील कलंक आहे आणि त्याला धुवून काढण्याचे पवित्र कार्य आम्ही स्वीकारले आहे. त्यासाठी आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही तयार आहोत."  अश्या पद्धतीने महाड येथे जाऊन सत्याग्रह करण्याचा निर्णय बाबासाहेबांनी प्रकट केला. तो निर्णय महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून निनादत गेला.  पू. बाबासाहेबांची मते आणि भूमिका किती स्पष्ट होत्या हे याच दरम्यान झालेल्या एका प्रसंगावरून आपल्या लक्षात येते.  बाबासाहेबांची उपरोक्त भीमगर्जना जणू फक्त ब्राह्मणांसाठी असावी असे वाटून काही मंडळींनी आंबेडकरांकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.  जेधे-जवळकर या ब्राह्मणेतर पुढाऱ्यांनी महाड सत्याग्रहाला आप...