एक 'सत्तांतर' असेही घडले होते...

"संत्तांतर" संपूर्ण जग आज एका घटनेमुळे विचलित झाले आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर आपली हुकूमत प्रस्थापित केली. या घटनेचे पुढील काळात दूरगामी परिणाम पूर्ण जगावर पडणार आहेत. परंतु तालिबान्यांनी केलेले सत्तांतर पाहिल्यावर अजून एक गोष्ट लक्षात येते. असेच एक सत्तांतर 1948 मध्ये भारतातही घडले होते. 'हैद्राबाद' संस्थानचा निजाम हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायला तयार होत नव्हता. त्यामुळे असाच एक संघर्ष झाला होता. परंतु दोन्ही संघर्षामध्ये खूप मोठा फरक आहे. तालिबानी ही एकप्रकारे दहशतवादी संघटनाच आहे आणि ते जिहादी कट्टरतावादी विचारांचे पुरस्कर्ते आहेत. शरियतच्या मार्गाने चालणारे व सर्व जगाला या मार्गावर आणण्यासाठी म्हणून शस्त्र हाती घेतलेल्या दहशतवाद्यांपेक्षा त्यांची वेगळी ओळख नाही. म्हणूनच तालिबानी सत्ता आल्यामुळे आज अफगाणिस्तानमध्ये 90 टक्के लोक मुस्लिम असूनही सर्वत्र भयग्रस्त वातावरण आहे. या दरम्यान तालिबान्यांनी अफगाणी महिलांचे एक सर्वेक्षणच करण्याचा फतवा काढला आहे. जेणेकरून त्या अफगाणी महिलांचा त्यांच्या सैन्यात लिलाव करता येईल. या धाकाने म...