पोस्ट्स

बंगालमध्ये हिंसेची धग कायम... पुढे काय होणार?

इमेज
-- कल्पेश जोशी    प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या राजकीय - जातीय हिंसाचाराची धग अजूनही कायम असून बंगाली हिंदू दहशतीच्या वातावरणात जगत आहे. या हिंसाचारात दीड महिन्यात आतापर्यंत 34 जणांच्या हत्या झाल्याचे सांगितले जात असून या मृतांमध्ये सर्वजण भाजपा, संघ, एबीव्हीपी कार्यकर्ता आणि सामान्य बंगाली हिंदू नागरिक आहेत ज्यांनी भाजपाला समर्थन केले होते. बंगाल मध्ये जे घडवले जात आहे, ते जाणीवपूर्वक सुनियोजित पद्धतीने होत असून एक विशिष्ट वर्ग युद्धे लक्ष्य केला जात आहे, त्यामुळे पूर्ण बंगालमध्ये दहशतीचे वातावरण झाले आहे.  मागील पंधरा दिवसात घडलेल्या काही घटना पाहता परिस्थिती किती भयानक व लोकशाहीविरोधी झाली आहे, हे आपल्या  लक्षात येईल.  ◾ एका 60 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेवर तिच्या सहा वर्षाच्या नातवासमोर बलात्कार करण्यात आला तसेच, एका अल्पवयीन मुलीवरही बलात्कार केल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करत न्याय मागितला आहे. भाजपसाठी काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असे पीडितेने सांगितले.  ◾ 5 जून रोजी भाटपाडा येथील भाजप कार्यकर्ता ज...

मदरश्यातील बॉम्बस्फोट - एक सेक्युलर विवेचन

इमेज
#तिरपिटांग बिहार च्या बांका मध्ये नुकतीच एक घटना घडली. सगळीकडे याचं वृत्त आलं आहे. घटनास्थळी मौलाना बॉम्ब तयार करत असतानाच मदरश्यात हा स्फोट झाला असेही निष्पन्न होत आहे. नेहमीप्रमाणे लगेच सगळ्यानी (विशेषतः मनुवाद्यांनी) मौलाना आणि मदरश्याकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. पण भारतीय नागरिक म्हणून आपली दृष्टी आपण कधी बदलणार आहोत? जातीय चष्मे फेकून सेक्युलरिजमच्या चष्म्यातून या घटनेकडे पाहिले पाहिजे. मदरसा म्हणजे शिक्षण संस्थाच आहे. शिक्षणसंस्था म्हणून त्यांना सगळे सरकारी लाभ मिळत असतात. मग अश्या विद्या ग्रहण करण्याच्या ठिकाणी काही प्रयोग केले जाऊ शकत नाही का?  संशोधन  आणि अभ्यास करण्यासाठी आयआयटीतच गेलं पाहिजे का? मदरश्यात काही प्रयोग करून पाहिले जात असतील तर त्यात काही गैर आहे का? मदरश्यात धार्मिक शिक्षण दिले जाते म्हणून काय झालं? धार्मिक शिक्षणाबरोबर तिथे काही वैज्ञानिक प्रयोग ही केले जातात हे या घटनेतून लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजेच काय तर मदरश्यात केवळ धार्मिक शिक्षण देऊन चालणार नाही, तर तिथे अत्याधुनिक शिक्षण देण्याचीच गरज निर्माण झाली आहे. हेही अधोरेखित होते....

अवैध घुसखोरी- भारताला लागलेला कर्करोग

इमेज
@कल्पेश जोशी  भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी  घुसखोरी या विषयात मोठे भाकीत वर्तवलेले आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या 'बांग्लादेशी घुसखोरी - भारताच्या सुरक्षेशी सर्वात मोठा धोका' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत दत्तात्रय शेकटकर यांनी आपले मत मांडले आहे. बांग्लादेशी घुसखोरी भारताला लागलेला कर्करोग असून आजच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे, देशातील राजकीय नेत्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना व नागरिकांना या धोक्याचे गांभीर्य कळणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आसाम मध्ये त्यांचा 'ऑल आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट' हा स्वतंत्र पक्ष तयार झाला असून त्यांचे चार खासदार व 17 आमदार निवडून आले आहेत. शेकटकर यांनी ही 2015 ची स्थिती मांडली असली तरी आजही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत एआययुडीएफ चे 16 आमदार निवडून आले आहेत हे लक्षात घेण्याजोगे आहे. घुसखोरी ही आता नंबर एकची राष्ट्रीय समस्या झाली असून ती वेळीच थांबवली नाही तर 2026 मध्ये आपल्याला आसाम व बंगाल मध्ये बांग्लादेशी मुख्यमंत्र...

बंगालमध्ये केंद्राने तात्काळ राष्ट्रपती राजवट का लावली नाही?

इमेज
बंगालमध्ये मोदी सरकार राष्ट्रपती राजवट का लावत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, राष्ट्रपती राजवट लावणं ही काही साधीसुधी बाब नाही. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसने जरूर कलम 356 चा सरसकट वापर केला असेल, पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आजची वेगळी आहे. त्यामुळे घाई करून चालणार नाही. केंद्राचे धोरण समजून घेतले पाहिजे. बंगाल मधील आपल्या कार्यकर्त्यांच्या रक्ताचे पाट वाहत असताना, सामान्य नागरिक टाहो फोडत असताना मोदी सरकारला यातना होत नसतील, असे नाही. मोदी कितीही संयमित असले तरी भावुक आहेत. पण आततायीपणा त्यांच्या अंगी नाही. शिवाय अमित शहा सोबतीला आहेतच. त्यांच्या इतका राजकीय चाणाक्ष व्यक्ती आजच्या घडीला कोणी नाही. परिस्थिती कशीही असो, डोकं शांत ठेऊन रणनीती आखणारी ही माणसं आहेत. त्यामुळे त्यांनी बंगालला वाऱ्यावर सोडलं किंवा ममताला माफ केलं असं अजिबात म्हणता येणार नाही. बंगाल निवडणुकांचा निकाल लागल्यापासून अमित शाह गायब आहेत. गृह मंत्रालयाच्या बातम्याशिवाय अमित शाह या महिनाभरात विशेष कुठे उमटून पडलेले नाहीत. आणि जेव्हा हे गायब होतात तेव...

अमानवीय बंगाल हिंसाचारास एक महिना पूर्ण! काही निरीक्षणं...

इमेज
1. विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये प्रचंड हिंसाचार उफाळला, त्याची धग अजूनही कायम आहे. या महिनाभरात बंगालसह देशभरात अनेक घडामोडी घडल्या, काही घडायला हव्या होत्या पण झाल्या नाहीत. जसे की हिंसा कोण करतंय आणि कोणाविरुद्ध होतीय हे महत्वाचे नसून हिंसाचार हा लोकशाहीसाठी व कायदा सुव्यवस्थेसाठी मारक आहे. त्यामुळे समस्त सुजाण भारतीयांनी याचा विरोध करायला हवा होता, जो झाला नाही.  2. बंगालमध्ये जाळपोळ, घरांची लुटालूट, हत्यासत्र, महिलांवर अत्याचार, दुकानांची तोडफोड, भाजप कार्यकर्त्यांची व सामान्य लोकांची अक्षरशः बुलडोजर लावून घरे पाडण्यात आली पण पोलीस प्रशासन फक्त मुकदर्शक होते. कोणावरही कारवाई अद्याप झालेली नाही. ममता बॅनर्जी सरकारने तर कोर्टात 'बंगाल मध्ये हिंसा घडलीच नाही' असे सांगून न्यायव्यवस्थेची थट्टा करायला कमी केले नाही.  3. आतंकवादी हल्ले अगदी 26/11 मुंबई हल्ल्याच्या वेळी मीडिया कश्या पद्धतीने सूचना डावलून रिपोर्टिंग करत होती हे सगळ्या देशाने पाहिलं. एखाद्या देशविरोधी आरोपीसाठी आरडाओरडा करणारे रिपोर्टिंगही आपण पाहिले आहेत. परंतु बंगालमध्य...

बंगाल हिंसाचार आणि हिंदू मानसिकता

इमेज
'आजचा बंगाल उद्याच्या काश्मीरकडे जात आहे' असे म्हंटल्यास आश्चर्य वाटेल, पण ते सत्य आहे. बंगाल मध्ये ज्या पद्धतीने मागील काही वर्षांपासून अराजकवाद व दहशत निर्माण करणाऱ्या आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहे व विशेषतः आताच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर हिंदूंसोबत झालेला नरसंहार पाहता ह्या घटना बंगाल मधील आहे की काश्मीर मधील, असा प्रश्न पडतो. त्यामुळे बंगाल आता भारताच्या भूमीवरील अराजक, मुस्लिम दहशत, धर्मांध व पुढे चालून फुटीरतावाद याला पोसणारं नवीन राज्य निर्माण होत आहे असे लक्षात येईल.  बंगाल मधील ममता सरकारने लोकशाही आणि संविधानिक शासन प्रणाली अक्षरशः गुंडाळून ठेवली आहे. 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर बंगालमध्ये तृणमूल कार्यकर्ता व स्थानिक धर्मांध जिहादी यांनी जो नंगानाच केला तो स्वतंत्र भारताच्या इतिहासातील पहिलाच असावा असे मत भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी केले आहे. यावरून या घटनांची भीषणता लक्षात येते. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत आहे, महिलांवर बलात्कार होत आहेत, ज्या लोकांनी भाजपला समर्थन केले त्यांच्या घरांवर हल्ले होत आहे, त्यांची संपत्त...

जनमत पाहता सरकार लॉकडाऊन तूर्तास लावणारही नाही, पण...

इमेज
    राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. सरकार याविषयी गंभीर दिसत असले तरी जनतेचा रोष ओढून घ्यायला तयार नाही. 2020 मध्ये कोरोना विरुद्ध सर्व पक्षांनी जे एकमत दाखवले तेही आज दिसत नाही. राज्यातील भाजप, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस ने ही लॉकडाऊन नको ही भूमिका घेतलीय. सरकार म्हणून कर्तव्य बजावत असताना काहीतरी भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणून नाईट कर्फ्यु कधीपासून सुरू करण्यात आला आहे. परंतु त्यामुळे कोरोना थांबवण्यात कितपत यश येतंय हा मोठा प्रश्न.       मागील वर्षी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. कित्येकांना दवाखान्यात उपचार घेण्यासाठी परवड झाली. लोकांच्या व्यथा ऐकायला गेलं की मन हेलावून जातं. परंतु तरीही काहीजण जाणीवपूर्वक कोरोनाबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे कोरोना खरच आहे की नाही? अश्या चर्चा जागोजागी सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा संभ्रम आराजकतेकडे नेऊ शकतो याची पुसटशी कल्पनाही या लोकांना नाही.      कोरोना हा आजार आहेच... हे जागतिक स्तरावरील शास्त्रज्ञांनी म...