पोस्ट्स

पाच' तारखेची 'नऊ' मिनिटे कश्यासाठी?

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5 तारखेचे केलेल्या आवाहनामागे हेतू काय आहे? हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. त्यामागे विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. पण एक साधी सरळ गोष्ट आहे जी आपण समजून घेतली पाहिजे. विरोध करणारे किंवा प्रश्न उपस्थित करणारे ते लोक आहेत ज्यांच्या गावात, शहरात अजूनही कोरोनाची भीती पसरलेली नाही. परंतु, ज्या गावात, गल्लीत आणि कॉलनीत कोरोनाग्रस्त आढळले आहेत तेथील लोक प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांच्यामध्ये सामूहिकतेची भावना निर्माण होऊन एकटेपणाची भावना गळून पडावी यासाठी हा प्रयत्न आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण न होताही मानसिक कोरोनाची जणू लागण सुरू झाली आहे. लोक प्रत्येक गोष्ट संशयित नजरेने बघत आहेत. काहींना घरात पुरेसं अन्न नाही. डॉक्टर, नर्स, पोलीस, शासकीय कर्मचारी दररोज न चुकता आपली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांच्याही मनात कोरोना विषयी दहशत आहे. घरून निघताना काळजीपोटी सूचना, सल्ले यांचा पाढा होत असतो. काहींना तर नोकरीवर पाणी सोडण्याचेही सल्ले आले असतील. परंतु एकाही व्यक्तीकडून याची सुरुवात झाली तर  एक लाट निर्माण व्हायला वेळ लागत नाही. एकाचा धीर खचला की ...

कोरोनाआडून 'छि' 'थू' करणारे प्रतिगामी..

इमेज
कोरोनाच्या निमित्ताने कथित पुरोगाम्यांनी पुन्हा आपले अकलेचे तारे तोडून हिंदू संस्कृतीला टीकेचे लक्ष्य केले आहे. विज्ञानाचा आणि शास्त्राचा एरवी दुरदूरपर्यंत संबंध नसणाऱ्या इस्लामिक व ख्रिश्चन तत्वज्ञानाला चुकूनही विरोध न करणाऱ्या पुरोगाम्यांमध्ये केवळ हिंदू द्वेषाची बीजे रोवली गेली आहेत हे कोरोनाच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे. कोरोनावर आयुर्वेद, योगा किंवा वैदिक शास्त्रात काही उपचारपद्धती नाही आणि शेण गोमूत्राने कोरोना जाणार का? असे निरर्थक युक्तिवाद करून आपलाच हशा करून घेतला आहे. संजय राऊत यांच्या 'देव जेव्हा मैदान सोडतो' या अग्रलेखातून त्याचीच प्रचिती आली. या शेण गोमूत्राचं एवढं काय वावडं आहे कळत नाही. बरं या गोष्टींना विरोध करताना विज्ञानाचा आसरा घेऊन जणू आपणच शास्त्रज्ञ आहोत आणि आपणच विज्ञानाला जन्म घातला असा अविर्भाव कश्याच्या जोरावर? पुरोगाम्यांनी फादर दिब्रिटो यांना ते केवळ चर्चचे फादर आहेत म्हणून डोक्यावर घेतले. पण त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही चर्च बंद होणार नाही असे सांगून सरकारी निर्देश धुडकावून लावले. ज्यांनी डोक्यावर घेतले त्यांचेच कान फादरा...

कोरोनातून सावरताना जेव्हा देश मोठा होतो..

इमेज
कोरोनाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी मुकाबला करणारा देश म्हणून भारत असल्याचे नुकतेच WHO चे भारतातील प्रमुख हेंक बेकडम यांनी वक्तव्य केले. याचबरोबर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करायला विसरले नाहीत. आरोग्याच्या बाबतीत तसूभरही निष्काळजीपणा झाला तरी संयुक्त राष्ट्राच्या सभेत कान उपटणारी ही संस्था आहे, हे इथे लक्षात घेतले पाहिजे.  कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता देशात अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज 62 लॅब तात्काळ उभारण्यात आल्या व अजून 52 लॅब उभारण्याच्या मागावर आहेत, हे सर्वात महत्वाचे काम सरकारने योग्य वेळी पार पाडले. दक्षिण आशियातही कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क देशांची तातडीनं कॉन्फरन्स मिटिंग घेऊन मोठ्या भावाची भूमिका घेतली. यामुळे सार्क देशांचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. शिवाय कोरोनाच्या बाबतीत लढताना सार्क देशही आपले निर्विवाद योगदान देतील हे निश्चित. या कॉन्फरन्स नंतर मालदीव, श्रीलंका, नेपाळ आणि भूतानच्या राष्ट्र प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत आपल्याला भारतामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगत मोदींजींचे आभार मानले.  ...

कोरोनाविरुद्ध लढणारा करुणामय भारत

इमेज
कोरोनाविरुद्ध लढणारा करुणामय भारत कोरोनाच्या विळख्यात जगभरातील अनेक देश पडले असताना विदेशात गेलेल्या आपल्याच नागरिकांना पुन्हा परत आणण्यास अनेक देशांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे एकतर आहे तिथेच गयावया करून उपचार करून घेणे किंवा आपल्या देशाची मदत मिळेल तोपर्यंत वाट पाहत बसणे याशिवाय दुसरा पर्याय कोणाकडे शिल्लक नाही. विदेशात गेलेले भारतीय नागरिक मात्र या बाबतीत नशीबवान ठरले आहेत.  भारत सरकारच्या योग्य नियोजनामुळे इराण, चीन, अमेरिका, इटली व अन्य कोरोनाग्रस्त देशातील नागरिकांना भारत सरकारने यापूर्वीच भारतात यशस्वी आणले आहे. चीनच्या वुहान शहरात भारतीय नागरिकांसह अडकलेले विदेशी नागरिक ताटकळत बसलेले असताना भारताने आपल्या नागरिकांना भारतात पुन्हा शरण दिलेच, शिवाय अन्य देशातील नागरिकांनाही सुखरूप त्यांच्या देशात सोडून अतिशय कौतुकास्पद महत्कार्य पार पडले आहेत. यामध्ये श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू येथील नागरिकांचा समावेश होता. या देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे याबद्दल आभार मानले आहेत.  चीनच्या वुहान शहरातून भारताने 76 भारतीय व 36 वि...

आमदार फुटताय की फोडले जाताय?

इमेज
तुमच्या राहत्या घरात भांडणं तुम्ही करायचे, घरात फाटाफूट झाली की मात्र दोष शेजारच्याला द्यायचा? का? तर, त्याला आनंद होतो म्हणून? काय म्हणावं याला.. काँग्रेसचं काही राज्यांसह देशात असंच काहीसं चाललंय. भांडणं आपल्या दरिद्री लक्षणांनी ओढवून घ्यायची, अन आमदार फुटू लागले की दोष भाजपला द्यायचा, कारण काय तर त्याला तेच हवंय म्हणून.? समोरच्याला लाख तुमच्यात फूट पडायची असेल, पण तुम्ही प्रेमाच्या गंगा वाहू दिल्यात तर ना. आपले हेवेदावे कमी होत नाही. ज्योतिरादित्य सिंधिया मोठा होऊन उद्या डोक्यावर मिरे वाटेल म्हणून त्याचा काटा काढायचा किंवा त्याला कायम आपल्या पेक्षा मागच्या स्थानावर मान द्यायचा हा मामु कमलनाथ चा डाव. सिंधीयला कळणार नाही असे आहे का? एकदा दोनदा सहन केलं अन ज्योतिरादित्य सिंधियाने केला स्वतःचा ओअक्ष निर्माण.  काँग्रेस पक्ष उद्या संपला तर आपलं दुकान स्वतःच्या भरवश्यावर सुरू राहावं म्हणून हा दूरदृष्टी ठेऊन केलेला प्लॅन आहे. शिवाय पक्षांतर्गत अवमान व मामु कमलनाथ यांच्याकडून मिळणारी हीन वागणूकही यास कारणीभूत.  सत्तेत आल्या आल्या संघाला संपविण्याची भाषा. स्वातंत्र्यवीर स...

दिल्लीकर पुरोगामी फेलच झाले!

इमेज
#तिरपिटांग संत्याभाऊ खूप दिवसांनी दिसला. मोठ्या मुश्किलने नोकरी लागली त्याला. पण, दुर्देव म्हणून व्यसनाच्या अधीन गेला बिचारा. तसं मग मी ही त्याच्याशी आपला कॉन्टॅक्ट कमी करून टाकला. प्यायला लागला तसा जास्तच फेकला गेला हो. दगड झाला अक्षरशः. काहीही बरळत असतो. पण आज मात्र कोरा दिसत होता. पण हे काय, पठ्ठ्या चक्क दंगडांशी बोलत बसला होता. वैचारिक डोस देणाऱ्या व दोन पैसे देऊन दारूच्या नादी लावणाऱ्या  दोन पायाच्या अनेक विज्ञाननिष्ठ मित्रांनी त्याला दारूचं महत्व पटवून दिलेलं होतं. दारुसोबत मनुवाद, युरेशियन, मूलनिवासी वगैरे वगैरे उच्च कोटीच्या विषयवार त्यांची तासन्तास चर्चा चाले. आज त्यांनी त्याची साथ सोडली होती. बहुधा काही कामाचा राहिला नसावा. पण संत्या भाऊ मात्र आपल्या सवयीशी ठाम होता. बिचारा काल पर्यंत दोन पायाच्या दंगडांशी बोलत होता, आज बिन पायाच्या दंगडांशी. छान गप्पा रंगल्या होत्या हो. मी पण काही डिस्टरब नाही केलं बॉ त्याला. त्यांचं संभाषण ऐकू लागलो.. संत्या बोलत होता. "काल पर्वा दिल्लीत दंगल घडली. दंगल कायची, घडवून आणलेला हिंसाचार अन सरकार विरोधी युद्धच होते ते. अन सरकारले...

खोट्या वृत्तांकन प्रकरणी तक्रार, कोण होणार हद्दपार?

इमेज
दिल्ली हिंसाचारात आयबी चे अधिकारी अंकित शर्मा यांची धर्मांध जिहादी मानसिकतेच्या लोकांनी हत्या केली. त्यांच्या शरीरावर 400 वेला चाकूने वार केले असे सर्वत्र वृत्त आहे. अतिशय क्रूरतेने त्यांची हत्या करण्यात आली आहे. परंतु त्याच वेळी जेव्हा देश धार्मिक संवेदनांनी संवेदनशील झालेला होता, अश्या परिस्थितीत काही न्यूज चॅनल व न्यूज पोर्टल चक्क चुकीच्या व बिन बुडाच्या संदर्भहीन बातम्या पसरविण्यात मशगुल होते.  WSJ - World Steet Journal यासारखे न्यूज पोर्टल या खोट्या वृत्तांकन केल्या प्रकरणी LRO - Legal Rights Observatory या संस्थेने WSJ च्या विरोधात परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. WSJ चा आशिया खंडातील प्रमुख एरीक बेलमन यास देशातून हद्दपार करावे व ज्या भारतीय पत्रकारांनी यांकगे वृत्तांकन केले त्यांचे प्रमाणन काढून घ्यावे अशी मागणी LRO ने केली आहे. तसेच WSJ ने जनतेची माफी मागावी असेही त्यांनी म्हंटले आहे.  गुप्तचर खात्याचे अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या करणारे जय श्री राम अश्या घोषणा देत होते व त्यांच्या हातात तलवारी व दंडुके होते, अश्या स्वरूपाचे वृ...