पोस्ट्स

जळणारे बांध, होरपळणारे वृक्ष

जळणारे बांध, होरपळणारे वृक्ष मार्च महिना लागला की रस्त्या रस्त्याने शेतीचे जळणारे बांध दिसणार नाहीत असे होत नाही. हायवे लगतचे शेत असो किंवा ग्रामीण रस्ते असो; उन्हाळ्य...

संविधानास धोका कोणापासून?

संविधानास धोका कोणापासून?       आपल्या भारतीय संविधानाची ओळख ते काही अंशी लवचिक तर काही अंशी तटस्थ अशी असल्यामुळे काही संविधान प्रेमी(?) त्यास वाट्टेल तसं वळण देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यास विरोध केल्यास त्या व्यक्तीवर संविधानविरोधी किंवा मनुवादी अशी टीका करतात. खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महत प्रयासातून आपले संविधान तयार झाले आहे व ते करताना त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशातील सर्व धर्म व समाज तसेच चलिरितीचा विचार करून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्यासोबतच भविष्यात त्या त्या काळानुसार संविधानात आवश्यक ते बदल करता यावे यासाठी घटनादुरुस्तीची सोयही करून ठेवली आहे. डॉ. बाबासाहेब किती द्रष्टे पुरुष होते हे यावरून लक्षात येते. परंतु आज मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी जेव्हा जेव्हा एखाद्या अनावश्यक विषयाला घटनेतून काढण्याचा किंवा आवश्यक त्या विषयाला घटनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा देशातील तथाकथित संविधानप्रेमी संविधान धोक्यात आहे किंवा लोकशाहीचा गळा घोटला जातोय अशी ओरड करतात. मग निमित्य तीन तलाक बिलचे असो किंवा गरीब सवर...

सरकारी योजना: पूर्वी आणि आता

सरकारी योजना: पूर्वी आणि आता     प्रचंड त्रास दैन्य सोसून देश 1947 ला  तावडीतुन मुक्त झाला. आता भारताचं नवीन शासन अस्तित्वात आलं होतं. नवीन घटना अस्तित्वात आली होती. सरकार आपल...

घटना एक, परिणाम अनेक

इमेज
          घटना एक, परिणाम अनेक    देश हळहळतोय खरा. राग व्यक्त होतोय खरा. पण राग व्यक्त होतोय कुणाविरुद्ध? हाती बंदूक व दारुगोळा घेऊन येणा-या आतंकवाद्यांविरुद्ध?      मग जरा थांबा. शत्रु केवळ हाती शस्त्र घेऊन आणि सिमा ओलांडून येणाराच असतो का? कदाचित असेलही. पण मग देशाला हादरवुन सोडणारा हल्ला आपल्या जवानांवर झाला. सारा देश शोकसागरात बुडालाय. हलोक श्रद्धांजली अर्पित करताय. पाकिस्तानचा निषेध व्यक्त करताय. अन् अश्या परिस्थितीत काही चक्क 'पाकिस्तान जिंदाबाद' बोलतात?? ज्यांनी हल्ला करविला त्या जैश ए महंमद आतंकवादी संघटनेचं कौतुक करतात?? '५६ इंच छातीच्या तुलनेत ४४ भारी पडलेत' असे विधान एनडीटीव्हीची पत्रकार निधी सेठी ही बया करते. काँग्रेसचे नवज्योतसिंग सिध्दू आतंकवाद्यांचा देश नसतो म्हणत पाकिस्तानचा बचाव करतात. फारुक अब्दुल्ला या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याचे विधान करतात. पुण्यात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करत असताना कुमार उपेंद्र सिंह नामक तरुण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देतो. अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीत...

पडद्यामागील मेंदू

इमेज
                  पडद्यामागील मेंदू      "काही नाही. जास्त चिंता करत बसू नका. हे काय नेहमीचेच झाले आहे. आततायी अहिंसा व सहिष्णुतेच्या बेडीत अडकलेल्या लाचार भारताच्या नशिबी हेच घडत राहणार आहे." चहाच्या टपरीवर सकाळी सकाळी एक आजोबा पेपर वाचत हताशपणे बोलत होते. त्यांचे बोलणे ऐकुन काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नव्हतं. कारण त्यांनी ना सरकारला दोष दिला ना विरोधी पक्षाला. त्यांनी भारतीय सेनेला व गुप्तचर विभागालाही दोष दिला नाही. त्यांनी देशाच्या मानसिक वर्मावर बोट ठेवले. म्हणुन हे कटू सत्य आजुबाजुच्या सगळ्याच ऐकणा-यांनी चहाच्या घोटाबरोबर पचवुन घेतलं.           पण, ही विचार करण्यासारखी बाब आहे, की आम्ही खरच किती अतिअहिंसावादी व अतिसहिष्णू झालो आहोत. पायाखाली किडे मुंगी चिरडून मेली तरी पाप समजणारे आणि थेंबभर रक्त पाहून चक्कर येणारे आम्ही अहिंसाप्रीय भारतीय सरेआम गळे चिरणा-या व बंदूकीच्या जोरावर माणसांच्या चिंध्या चिंध्या करणा-या आतंकवादी व नक्षलवाद्यांशी दोन हात करु शकणार आहोत क...

२०१४ ची पुनरावृत्ती अटळ?

------------------------------------------------ २०१४ ची पुनरावृत्ती अटळ? -----------------------------------------------    _दोन दिवसापुर्वी एटीसच्या छाप्यात काही दहशतवादी पकडले गेले आहेत. त्यातील जप्त केलेल्या साधन सामग्रीवरुन ते कुंभमेळ्यातील ...