पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आंदोलन आणि वास्तव (भाग २)

इमेज
        1955 च्या नागरिकत्व कायद्यानुसार कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकाला भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी सलग 11 वर्ष भारतात निवास करण्याची अट होती, ती सरकारने हिंदू, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, इसाई आणि शीख समुदायासाठी कमी करून 6 वर्ष केली. या व्यतिरिक्त अन्य कोणाला भारताचे नागरिकत्व हवे असल्यास त्यांना 11 वर्षाची अट कायम आहे. त्यामुळे मुस्लिमांना या घटना दुरुस्तीमधून टाळले म्हणून संताप व्यक्त करण्याचा किंवा मुस्लिमांना भारतातून हकालण्याचा प्रश्नच येत नाही.        "आम्ही नाही, मग ते का?" हा हट्ट कश्यासाठी? विरोधी पक्षांनी मुस्लिम समुदायाच्या या बालहट्टाला राजकीय बूस्टर लावला आहे. मोदी सरकारविरोधात एवढ्या शक्तीनिशी विरोधकांना केवळ अशक्य होऊन बसले होते, ती संधी सीएए व एनआरसीच्या निमित्ताने चालून आली असल्यामुळे नवीन सरकारविरोधी नवीन मुद्दा हाती येत नाही तोवर सीएए व एनआरसी विरोधाचे गुऱ्हाळ चालूच राहणार आहे. हा कायदा मागे घेतला जाणार नाही हे सरकारने स्पष्ट केले आहे व ते अशक्यही आहे. त्यामुळे पुढील काही दिवस पुढाऱ्यांचे राजकारण आणि जनतेचे मनोरंज...

पराभव नव्हे राजकीय बलिदान !

इमेज
           दिल्ली केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे कालच निकाल लागले. आम आदमी पक्षाला जनतेने कौल दिला. परंतु, या निवडणुकीतून एक विचार मात्र पुन्हा सिद्ध झाला आहे. या निवडणुकीत भाजप खरोखरच पराभूत झाला की 'विजयी' याचा विचार करावा लागेल.        सीएए च्या विरोधात त्यांनी देशभर गदारोळ माजवला, हिंसाचार केला, देशविरोधी घोषणा देऊन आपले देशविघातक मनसुबे सिद्ध केले तरीही आज 'आप'च्या विजयाने 'त्यांचा' विजय झाला आहे. देशभर 'ते' जल्लोष करीत आहे.         'ते' अल्पसंख्याक असूनही सत्ताधारी त्यांच्या इच्छेप्रमाणे निवडू शकतात. कोणाला जिंकवायचं, कोणाला पाडायचं, कोणावर बहिष्कार टाकायचा हे 'फतवे' ठरवतात. सत्य उमगूनही आजवर काँग्रेसने त्यांची चाटुगिरी सोडली नाही, कारण त्यांना याचे भान होते.         मुस्लिम तुष्टीकरण करून काँग्रेसने 70 वर्ष सत्ता भोगली. हिंदुत्वाविषयी आत्मविस्मृत समाज आणि देशाशी घेणं देणं नसलेल्या लोकांच्या भरवश्यावर हिंदुत्व आणि राष्ट्रवादाचे राजकारण करणाऱ्या भाजपला कोण मत देणार? खरं तर भाजप...

आंदोलन आणि वास्तव (भाग १)

इमेज
 नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या  मुद्द्यावर देशातील मुस्लिम समुदायाने जे काही आंदोलन चालवले आहे, त्याचा दीड महिना उलटून गेल्यावरही कुणी भ्रम पसरविला गेला असल्यामुळेच हे घडत आहे असे म्हणत असेल तर त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. भ्रम किंवा अफवा अल्प काळापुरत्या प्रभाव दाखवीत असतात. सत्य व वास्तव समोर आल्यावर ते स्वीकारल्यानंतर भ्रम संपुष्टात आलेला असतो.  आज नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी सुरू होऊन एक महिन्याच्या वर दिवस उलटून गेले आहेत. देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आपल्या प्रत्येक भाषणात व मुलाखतीत सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आहेत. त्यामुळे एक विशिष्ट वर्ग सोडला तर सीएए व एनआरसी अन्य लोकांना कळला आहे, तर बाकीचे कळूनही न कळल्याचे सोंग घेऊन फिरत आहे आणि काहींना तर हा कायदा समजूनच घ्यायचा नाहीये असेच म्हणावे लागेल. त्यामुळे यामागे धार्मिक राजकारण आहे हे समजून घेतले पाहिजे.  विदेशी हिंदूंना नागरिकत्व मिळाल्याने हिंदूंची भारतातील संख्या वाढणार, म्हणजेच पर्यायाने मुस्लिमांची संख्या कमी होणार आहे. याचा धसका मुस्लिमांनी घेतलाय का? असा धसका ...