पोस्ट्स

जानेवारी, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सेना, मनसे आणि 'ते'

इमेज
शरद पवार म्हणतात महाविकास आघाडीत मुस्लिमांच्या सांगण्यावरून सहभागी झालो. अशोक चव्हाण सांगतात महाविकास आघाडीत मुस्लिम समुदायाच्या आग्रहावरून सहभागी झालो. हुसेन दलवाई म्हणतात आम्ही सोनिया गांधी व पक्ष श्रेष्ठींना शिवसेनेचे हिंदुत्व भाजपपेक्षा कसे वेगळे आहे हे समजावून सांगितले.  CAA व NRC च्या मुद्द्यावर आपल्यापासून दूर गेलेले अल्पसंख्याक समुदायाचे मत पुन्हा आपल्याकडे ओढण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी खुलेआम त्यांच्या मोर्चांना व आंदोलनाला पाठिंबा देत आहे. हिंदूंच्या विरोधात गेल्यामुळे आपली सत्ता कोसळेल व भविष्यात फटका बसेल याचा काँग्रेस राष्ट्रवादीला चिंता वाटत नाही. आपल्या हिंदूविरोधी भूमिकेमुळे शिवसेना नाराज होईल आणि त्याचा परिणाम सत्तेवर होईल याचीही चिंता काँग्रेस राष्ट्रवादीला वाटत नाही.  एवढी बेफिकिरी येण्यामागे या तिघाडी सरकारमध्ये काय ठरलं आहे? असा कोणता मुद्दा आहे की ज्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेवर एवढी विश्वास (?) ठेवून आहे. असे अनेक प्रश्न आज जनतेला पडत असतील. कारण एकीकडे शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी नाराज होईल याची पार चिंता वाटते. त्यासाठी त्यां...

पुस्तक, मोदी आणि बरंच काही...

इमेज
पुस्तक, मोदी आणि बरंच काही... छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा होणे असंभव आहे, अस पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत एका भाषणादरम्यान म्हंटले होते. एवढेच काय तर मी शिवरायांना आदर्श मानतो व त्यांच्यासारखे गुण आत्मसात करून भारतमातेच्या सेवा करू इच्छितो असेही ते म्हणाले होते. त्यामुळे एखाद्या लेखकाला किंवा व्यक्तीला काय वाटतं यात मोदींजींचा मुळात दोष नाही. तरीही चिखलफेक मात्र त्यांच्यावरच होतेय, हे काही योग्य नाही. तथापि, या पुस्तकाच्या निमित्ताने आपण महापुरुषांप्रमाणे होण्याच्या केवळ गप्पाच मारू शकतो किंवा माराव्यात हेच अपेक्षित कार्यच की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. सलूनवर गेल्यावर न्हाव्याला विशिष्ट कट करायला सांगायचा, पुतळे उभारायचे, विद्यापीठांना नावं देण्यासाठी भांडण करायची, पुतळे कापून पळवायचे, शाइफेक करायची, नाव ठेवायची, गाडीवर फोटो लावायचे, खंडण्या गोळा करून मिरवणुका काढायच्या वगैरे वगैरे अनेक दृढ पद्धती आज अवतरल्या आहेत, ज्याद्वारे आपल्याला आपल्या आदर्श व्यक्तीसारखे होता येते. त्या व्यक्तीच्या गुणांना, कर्तृत्वाला, कर्माला काही स्थान नाही व ते आत्मसातही कुणी करायचे नाहीत. ...

संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान...

इमेज
संतांच्या भूमीत संतसाहित्याचा अवमान... 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादाचा विषय होता, 'संत साहित्य व बुवाबाजी'. प्रत्येकवेळी चिकित्सा व चर्चा या हिंदू संस्कृतीशी संबंधित विषयांवरच का? बायबल आणि कुराण बद्दल चर्चा व परिसंवाद घेण्याचे तथाकथित पुरोगामी साहित्यिक व आयोजकांकडे नाही का? आपल्या उदार अंतःकरणाने कधीतरी मुस्लिम, ख्रिश्चन बांधवांचाही विचार करावा म्हणतो. शेवटी तीही माणसंच. बिचारी कोणी फतवा काढला की लगेच दगड हाती घेतात आणि समाजसेवेचे ढोंग घे म्हंटल्यावर लगेच मदर तेरेसा होतात. वास्तवदर्शी जीवन महात्म्य आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन भारतमातेच्या सर्व लेकरांना देण्यासाठी कधी तसदी घेणार की नाहीत ही भुरटी माणसं? कुणी मदरश्यात आधुनिक शिक्षण व विज्ञान तंत्रज्ञान शिकवू म्हंटले तर त्यालाही विरोध करायचा आणि आपणहूनही काही प्रयत्न करायचे नाही. मग या भुरट्या पुरोगाम्यांना भारतातील मुसलमानास काय फक्त आतंकवादीच करायचे आहे का? मुसलमानांच्या पोराने केवळ बंदूक आणि दगडच हाती घ्यायचे आणि आपला मात्र उद्देश साधून घ्यायचा असा तर या विचारवंतांचा उद्देश नाही ना? तीन त...