भारताचा बांगलादेश होता होता राहिला का?
भारताचा बांगलादेश होता होता राहिला का? जर मोदी सरकार 400 पार गेले असते तर काय झाले असते? ईव्हीएम वरून लोकांचा विश्वास का उडवला जात होता? ईव्हीएम वर कुऱ्हाडीने घाव का घातले जात होते? सुप्रीम कोर्टाच्या निकालाला सुद्धा मान्य न करणारी वक्तव्य का येत होती? मोदी सरकार 400 पार गेले असते तर देशात सरकार, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवरील विश्र्वासच उडवून लावायचा आणि मोठी अराजकता निर्माण करायची असा डाव होता का? बांगलादेशमध्ये जे काही होतंय त्यामागे असलेली डीप स्टेट, मुस्लिम कम्युनिस्ट महायुती, अमेरिकेचा हस्तक्षेप, जॉर्ज सोरोस सारख्या वोक धनाढ्य लोकांचा पाठिंबा हे काय दर्शवते? ही सर्व परिस्थिती आज विचारात घेता जे होते ते चांगल्या साठीच होते असे म्हणणे योग्य ठरेल. प्रभू श्रीरामाने अयोध्येत स्वतःवर पातक लावून घेतले पण भारत वाचवला आहे. मोदींच्या थोड्या अपयशातच मोठा विजय झाला आहे. येणारा काळ अनेक गूढ समोर आणणार आहे. पण मोदी 400 पार न गेल्यामुळे भारत विरोधी शक्तींना आपला डाव साध्य करता आलेला नाही. या सर्व परिस्थितीतून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे. भारताचा शत्रू कोण आहे...