पोस्ट्स

देश कोणी विकायला काढला होता?

इमेज
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक व विशेषतः काँग्रेस पक्षाकडून सारखा आरोप होत असतो की त्यांनी देश विकायला काढलाय. त्याच बरोबर सत्य, परखड आणि देशहिताची बाजू मांडणाऱ्या आजच्या माध्यमांना गोदी मीडिया म्हणून हिणवलं जातं. पण देश कोणी विकायला काढला आणि गोदी मीडिया कोण होतं, याचं एकच उदाहरण काँग्रेस आणि विरोधकांची झोप उडवून देऊ शकतं.  ज्या काळात सोव्हिएत रशिया बलाढ्य होता आणि त्याची केजिबी ही गुप्तचर यंत्रणा त्यांच्या काह्यातील देशांना वाळवी लावत होती, त्याच दरम्यान भारतात आलेल्या दोन केजीबी अधिकाऱ्यांनी (युरी बेझमेनोव्ह आणि व्हसिली मित्रोखिन) मोठे गौप्यस्फोट केले आहेत.  बेझमेनोव म्हणतात की भारत ही  जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असल्याचे कितीही सांगितलं जात असलं, तरी भारत ही एक निरंकुश राज्यव्यवस्था होती जिच्यावर जवाहरलाल नेहरू व इंदिरा गांधी यांचा एक अधिकार चालत होता. तसेच भारत आपल्या अलिप्ततावादाचा कितीही गजर करत असला तरी तो सोवियत रशियाचा अंकित झालेला देश होता. इंदिरा गांधींनी राज्यकारभार सांभाळाला त्या क्षणापासून त्या रशियाच्या खिशात होत्या. इंदिरा गांधींच्या काळात ...

आग पुन्हा भडकली!

इमेज
हमास - इस्रायल युद्धात आता इराण ने उडी घेतलीय. काल इराण ने इस्रायल वर 200 मिसाईल डागल्या आहेत. त्यात इस्रायलचे किती नुकसान झाले याबाबत स्पष्टता नाही पण ह्या मिसाईल इस्रायलच्या राजधानी तेल अविव मध्ये डागल्या गेल्या आहेत  व तिथे मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झालेली असू शकते.  इस्रायलच्या आजूबाजूला सर्व इस्लामिक देश आहेत आणि सर्वांचे इस्रायल सोबत वैर आहे. कारण इस्रायल गैर इस्लामी देश आहे. म्हणजेच ही भूमी दारुल हरब  (मुस्लिमांसाठी युद्धाची भूमी) आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम देश इस्रायल विरोधात (प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष) उभे आहेत. त्यात प्रत्यक्ष इराण आणि लेबनॉन ने नुकतीच उडी घेतलीय.  आता चर्चा ही सुरू आहे की तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. जगभरात शांतीचा नारा देणाऱ्या इस्लामिक शक्ती हमास या दहशतवादी संघटनेला का जबाबदार धरत नाही व त्याच्याविरुद्ध का कारवाई करत नाही? ह्याच हमास मुळे हे युद्ध पेटले आहे. हमास ने गेल्यावर्षी इस्रायल वर रॉकेट हल्ले केले, शिवाय गुप्तपणे शिरलेल्या दहशतवाद्यांनी इस्रायली महिला, बालके, पुरुष यांना ओलीस ठेवले. अनेकांच्या हत्या केल्या, त्याचे व्ह...