पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंगुली निर्देश (?)

इमेज
काही दिवसांपूर्वी एक विषय चर्चेत आला होता. शिवसेनेला गृहमंत्री पद हवं होतं. (अश्या चर्चा माध्यमातून समोर आल्या होत्या) पडद्याआड चर्चाही झाल्या. तेव्हा, मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद यशस्वीपणे सांभाळू शकतो अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार. तथापि, मिडियासमोर आमच्यात असं काहीच झालं नाही, सगळं आलबेल आहे, आणि बाहेर गृहमंत्री पदावरून निरर्थक चर्चा सुरू आहे असा सूर मुख्यमंत्र्यांचा स्पष्टीकरण करताना होता. पण..पण..पण.. आज जी घटना घडली ती जरा वेगळी आहे. तिच्यामागे वेगळे कंगोरे आहेत. आजच्या घटनेत आंदोलनात (स्वाभाविकपणे) मुख्यमंत्री किंवा परिवहन मंत्री टार्गेट होऊ शकत होते. पण मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी किंवा अनिल परबांच्या निवासस्थानी न जाता शरद पवार यांच्या घरावरच संपकरी चालून गेले आहेत. इथे मोठं प्रश्नचिन्ह उभं होतं.  आता एक प्रश्न पडतो.  शरद पावरांसारखा नेता त्या वेळी कुठे आहे, हे आंदोलन करणार्यांना कसं माहीत झालं? पवार साहेब कधी दिल्लीला असतात, कधी बारामतीला असतात तर कधी मुंबईला असतात. कोणालाही सुगावा न लागता आंदोलनकर्ते योग्य जागी कसे पोहचतात? भरीस भर म्हणज...

राज ठाकरेंच्या मनासारखं होतंय..!

इमेज
गेल्या पंधरवाड्यापासून राज ठाकरे आणि मनसे जोरात चर्चेत आहेत. कारण ठरलं मशिदीवरच्या भोंग्याचं. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली जाईल असा पवित्रा राज यांनी घेतला. त्याला पाहता पाहता देशभरातून विविध पक्ष, संघटनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला. मुस्लिम समाजाकडून स्वाभाविकपणे विरोध झाला. पण यात गोची शिवसेनेची झाली. तथाकथित पुरोगामी म्हंटले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, समाजवादी पार्टी वगैरे पक्षांचा खोटा सेक्युलरवादी बुरखा पुन्हा फाटला. राज यांना हेच हवे होते. भाजप मात्र राज यांच्या रडार समविचारी असल्यामुळे वरून वाचला आहे.  हिंदुत्वाच्या मुद्दा हाती घेतल्यापासून मनसेचा हा पहिलाच जोरदार प्रयत्न झाला आहे. मधल्या काळात हिंदुत्वाच्या मुद्दयावर प्रकट होण्यासारख्या बऱ्याच घटना घडल्या, त्यावर मनसेकडून प्रतिक्रिया आल्या नाहीत. परंतु यावेळी पालिका निवडणुका समोर ठेवून मनसेने चांगली मोर्चा बांधणी केलेली दिसते. त्यातच राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेताना खूप बारकाईने विचार केला आहे. आपल्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर भाजपच्या घोरणापेक्षा वेगळा विचा...

रामचरित्रातील 'राष्ट्रसंदेश'

इमेज
जोपर्यंत भारत आहे, तोपर्यंत राम चरित्र आपल्यासाठी संजीवनी संदेश आहे. रामचरित्र अभ्यासताना आपण कधी असा विचार केलाय का हो? रावणाच्या बेंबीतच घाव करायचा होता, रावण तेवढ्या एका कृतीने मरणार होता, तर ते काम एकट्या हनुमंतानेही करून दाखवलं असतं. सीता माईला संदेश देण्यासाठी हनुमंत लंकेत गेले तेव्हाच रावणाचा काटा काढला असता. परंतु, ज्या समाजाला रावणाने छळलं. त्रास दिला. महिलांना पीडा दिली. साधू संतांच्या हत्या केल्या. दहशत पसरवली. अन्याय, अनीतीने समाजसोबत व्यवहार केला. त्या समाजाच्या सहभागीतेतूनच श्रीरामाला रावणाचा (शत्रूचा) नाश करायचा होता. रामाला आपल्या प्रजेला स्व-संरक्षणक्षम करायचं होतं, आपल्या पायावर उभं करायचं होतं. कोणीतरी येईल आणि आपल्याला त्रासातून मुक्त करेल, हा भावच रामाला संपवायचा होता. हे राष्ट्र, ही भूमी, हा प्रदेश आपला आहे आणि त्याचं रक्षण करणं केवळ राजाची जबाबदारी नाही, तर प्रजेचीही आहे हा संस्कार रामाने प्रजेमध्ये निर्माण केला आहे.  14 वर्षाचा वनवास म्हणजे रामाला झालेली शिक्षा नव्हती. तर रामाने आपले राष्ट्र सुरक्षित, सक्षम व संघटित समाज निर्माण करण्यासाठी स्वीका...